AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खबरदार… विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढाल तर पस्तावाल, पोलिसांचे आदेश काय ?

विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढून का, असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. विसर्जन झाल्यावर गणरायाच्या मूर्तीचे फोटो काढले, तसेच प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हे महत्वाचे आदेश दिले आहेत.

खबरदार... विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढाल तर पस्तावाल, पोलिसांचे आदेश काय ?
| Updated on: Sep 04, 2024 | 10:15 AM
Share

द्धीची देवता, सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले असून गणेशाच्या स्वागतासाठी सर्व भक्तगण सज्ज झाले आहेत. पूजा, प्रसादाची तयारी, डेकोरेशन, या सर्व कामांची लगबग आता सुरू झाली असून गणपती बाप्पा मोरया चा गजर करच घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळातही गणराय लवकरच विराजमान होतील. मात्र याच दरम्यान पोलिसांनी काही महत्वाचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढून का, असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. विसर्जन झाल्यावर गणरायाच्या मूर्तीचे फोटो काढले, तसेच प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हे महत्वाचे आदेश दिले आहेत.

विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढू नका अन्यथा… काय म्हटले आहे आदेशात ?

7 सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होणार असून त्यानंतर दीड दिवसापासून पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत विविध दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात येते. त्यासंदर्भातच पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.

08, 11, 12, 13 आणि 17 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन होणार आहे. विसर्जनानंतर काही अर्ध्या विरघळलेल्या मूर्ती भरतीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून येतात किंवा तलावाच्या पाण्यावर तरंगतात. काही लोक अशा तरंगणाऱ्या मूर्तीचे फोटो काढतात, तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी मूर्ती गोळा करतानाचे फोटो टिपतात आणि धार्मिक भावना दुखावतील तसेच सार्वजनिक शांतता व भावना भंग पावतील असे फोटो प्रसारित अथवा प्रकाशित करतात.

विसर्जनानंतर असे फोटो काढणे, प्रकाशित करणे, हे प्रतिबंधित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना आवश्यक आहेत. आणि कलम 163 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 अन्वये त्वरीत प्रतिबंधासाठी जलद उपाय करणे इष्ट आहे.

याप्रकरणी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी आदेश दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीने विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढू नयेत अथवा ते प्रसारित करू नयेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहेत. 8 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत हा आदेश लागू राहील.

तसेच या आदेशाचे उल्लंघ केल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, दंडही ठोठावला जाऊ शकतो.

Follow Us
महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
Pune Mahapalika | महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; थेट
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; त्या ई-मेलमागील सत्य प्रथमच समोर
पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता
Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर...
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?