AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक कपडा एक करंजी, हा उपक्रम कुणी आणि का सुरू केला

शहरातील सिग्नलवर, उड्डाण पुलाच्या खाली, रस्त्याच्या कडेला उघड्यावर संसार थाटलेले अनेक जणांची दिवाळी गोड करण्यात येत आहे.

एक कपडा एक करंजी, हा उपक्रम कुणी आणि का सुरू केला
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 22, 2022 | 1:49 PM
Share

Nashik News : गोरगरिब आणि रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांमध्ये दिवाळी (Diwali Festival) साजरी होत नाही. अशा व्यक्तीना दुजाभाव वाटू नये याकरिता सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (NCP) “एक कपडा एक करंजी” हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये गरिबांना कपडे, महिलांना साड्या, फराळ आणि लहान मुलांना फटाक्यांचे वाटप करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी हा उपक्रम राबविला आहे. दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक कुटुंब ऐपतीप्रमाणे दिवाळीचा आनंद साजरा करतात. पण गोरगरिब तसेच रस्त्यालगत राहणाऱ्या कुटुंबाना यापासून वंचित राहावे लागते. गोरगरिबांना किमान कपडे आणि गोडधोड मिळावे त्यांना दुजाभाव वाटू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही एक कपडा एक करंजी उपक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हाती घेतला आहे.याच उपक्रमाची चर्चा होत असून गरिबांची दिवाळी गोड होत आहे.

यामध्ये गरजू व्यक्तींना कपडे, महिलांना साड्या, फराळ तसेच लहान मुलांना कपडे व फटाक्यांचे वाटप करण्यात आले.

सर्वसामान्य नागरिक दिवाळीला नवीन कपडे आवर्जून खरेदी करतो. तसेच प्रत्येक घरा-घरात दिवाळीत फराळ बनविण्यात येतो.

नवीन कपडे खरेदी केल्यावर अपोआप जुन्या कपड्यांकडे दुर्लक्ष होते. हे जुने कपडे गरजवंताला उपयोगी पडतात.

यामुळे अशा कुटुंबांकडून कपडे, फराळ व फटाके जमा करून गरजवंतापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शहरातील सिग्नलवर, उड्डाण पुलाच्या खाली, रस्त्याच्या कडेला उघड्यावर संसार थाटलेले अनेक जणांची दिवाळी गोड करण्यात नाशिक राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस पुढाकार घेत त्यांची दिवाळी गोड करत आहे.

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने सुरू केलेल्या या उपक्रमाची शहरात चर्चा होत असून गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठीचा पुढाकार यंदाही कायम ठेवल्याने कौतुक केले जात आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.