AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदा प्रश्नावर 45 मिनिटे चर्चा, अमित शहांसोबत खलबत… दिल्लीत काय घडलं?

राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आज राज्याच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कांदा प्रश्नावर 10 दिवसात सकारात्मक तोडगा निघेल असे आश्वासन मिळाले आहे अशी माहिती समोर आली आहे.

कांदा प्रश्नावर 45 मिनिटे चर्चा, अमित शहांसोबत खलबत... दिल्लीत काय घडलं?
Onion Price Delhi MeetingImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 27, 2026 | 5:52 PM
Share

राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आज राज्याच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कांदा प्रश्नावर 10 दिवसात सकारात्मक तोडगा निघेल असे आश्वासन मिळाले आहे अशी माहिती समोर आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, नेते हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील हजर होते. या बैठकीत नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?

अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले की, या बैठकीला अनेक मंत्री उपस्थित होते. एमएसपीचा दर वाढवण्यामध्ये लवकरच निर्णय होईल. 10 दिवसांमध्ये याबाबत निर्णय होईल असं अमित शहा यांनी आम्हाला सांगितलं आहे. तुम्ही आनंदाने जावा, निर्णय आम्ही करू असं त्यांना आजच्या बैठकीत सांगितलं आहे. दुसरी मागणी आम्ही केली होती की इथेनॉलचा कोटा वाढवून द्या. यावरही त्यांनी कोटा वाढवून देण्यास होकार दिला आहे. साखरेचा दर आणि इतरही अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली आहे.

सुनेत्रा पवार यांनी काय म्हटले?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले की, कांदा आणि साखर उद्योगावर सकारात्मक चर्चा झाली आहे. 10 दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय होईल असं अमित शाह यांनी सांगितलं आहे. कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. आम्ही या बैठकीवर समाधानी आहोत. कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि इतरही अनेक अधिकारी हजर होते. यावेळी सकारात्मक आश्वासन मिळाले आहे. कांदा निर्यात देखील उठवली असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.

कांदा निर्यातबंदी उठवणार

दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले की, कांद्याच्या निर्यातीवरील बंदीमुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही अशी तक्रार होती. यावत अमित शहांनी सांगितले अशी कोणतीही निर्यातबंदी नाही, आणि जरी निर्यात बंदी असली तरी मी उद्या सकाळपर्यंत ती उठवेल. त्यामुळे बंदी नसेल. तसेच अधिक कांदा खरेदी केंद्रे सुरू होतील असं शिवराज सिंह चव्हाण यांनी म्हटले आहे अशी माहितीही वळसे पाटील यांनी दिली.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा