AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीचा शिवसेनेला ठेंगा, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष काँग्रसचे, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे!

चेअरमनपदी काँग्रेसचे बापूराव पाटील तर व्हॉइस चेअरमनपदी राष्ट्रवादीचे मधुकर मोटे विजयी झाले. महाविकास आघाडी जिल्हा एकत्र भाजप विरुद्ध एकत्र लढली होती, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सर्वांना प्रत्येकी 5 जागावर विजय मिळाला होता मात्र शिवसेनेच्या पदरात काही पडले नाही.

महाविकास आघाडीचा शिवसेनेला ठेंगा, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष काँग्रसचे, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे!
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बापुराव पाटील आणि उपाध्यक्षपदी मधुमकर मोटे यांची निवड झाली.
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 07, 2022 | 3:59 PM
Share

उस्मानाबाद ग्रामीण भागात शिवसेनेचे प्रभुत्व आहे. मात्र भाजपला शह देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Osmanabad District Bank) निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मोट बांधली. निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे 5-5 संचालक निवडून आले. मात्र ऐन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना तोंडावर आपटली. आज जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूक महाविकास आघाडीत अखेर फुट पडली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले ती महाविकास आघाडीसाठी पुढाकार घेणारी शिवसेना मात्र एकटी पडली. शिवसेनेचे 5 संचालक निवडून आले होते. त्यापैकी एक संचालक भूम परांड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेनेच्या गटातून फुटून काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला. एकंदरीत या निवडणुकीत शिवसेनेला भोपळा मिळाला. 11 विरुद्ध 4 मतांनी काँग्रेस व राष्ट्रवादी विजयी झाले.

प्राबल्य असूनही शिवसेनेला भोपळा

खासदार ओमराजे निंबाळकर व संपर्क प्रमुख आमदार तानाजीराव सावंत यांना मोठा दणका मानला जात आहे. ग्रामीण भागात सहकारमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असतानाही जिल्हा बँकेत काही हाती लागले नाही. शिवसेनेने भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना शह देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केली, भाजप व आमदार राणा यांचा पराभव केला मात्र विजयाचा आनंदोत्सव शिवसेनेला जास्त काळ टिकवता आला नाही. काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्र आल्याने शिवसेना तोंडावर पडली.

अध्यक्ष बापूराव पाटील, उपाध्यक्षपदी मधुकर मोटे

चेअरमनपदी काँग्रेसचे बापूराव पाटील तर व्हॉइस चेअरमनपदी राष्ट्रवादीचे मधुकर मोटे विजयी झाले. महाविकास आघाडी जिल्हा एकत्र भाजप विरुद्ध एकत्र लढली होती, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सर्वांना प्रत्येकी 5 जागावर विजय मिळाला होता मात्र शिवसेनेच्या पदरात काही पडले नाही. उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी आजवर 11 चेअरमन झाले त्यात मधुकरराव चव्हाण, नानासाहेब हरिश्चंद्र पाटील,विक्रम दगडोबा पडवळ,महारुद्र आनंदराव मोटे, लक्ष्मण आनंदराव मोटे,शिवाजीराव प्रतापराव चालूक्य,पवनराजे निंबाळकर, बापूराव माधवराव पाटील, पंडितराव प्रलहादराव टेकाळे, सुरेश बिराजदार हे होते त्यात मधुकरराव चव्हाण, विक्रम पडवळ,महारुद्र मोटे,बापूराव पाटील या 5 जणांनी दोन वेळेस चेअरमनपद भीषविले. पवनराजे यांच्या नंतर शिवाजीराव चालूक्य यांनी 5 वर्ष 10 महिने चेअरमनपदी होते. बापूराव पाटील यांनी 2 वेळेस 4 वर्ष 9 महिने पद भूषविले. सर्वात कमी काळ हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांचा प्रतिष्ठेचा होता. आजवर जिल्हा बँकेच्या काळात 17 व्हॉइस चेअरमन झाले त्यात सर्वाधिक काळ हा भाजपचे नेते पाटील चिंतामणराव शिंदे यांचा 19 मे 2005 ते आजवरचा असा 6 वर्ष 9 महिने असा आहे.उपाध्यक्ष म्हणून विनायकराव पाटील, विक्रम पडवळ,अशोकराव इंद्रजीतराव जवळगे,नानासाहेब बळीराम जाधवर, शिवाजीराव चालूक्य,शिवाजी गाढवे, सुरेश बिराजदार,ऍड सुभाषराव मोरे, शिवाजी गणपतराव पाटील, पंडितराव प्रल्हादराव टेकाळे, राहुल काकासाहेब पाटील, नारायण किसनराव समुद्रे, संजय गौरीशंकर देशमुख व कैलास शिंदे यांचा समावेश आहे.

इतर बातम्या-

नितेश राणे काय म्हणाले माहीत नाही, मी भाजपचा शिपाई आणि हिंदुत्ववादी नक्कीच : देवेंद्र फडणवीस

इतिहासात ठाकरे सरकारचं नाव नोंदवलं जाईल, पण कोणत्या कारणासाठी? फडणवीसांनी सांगितलं!

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ