AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad | सुजय विखे पाटलांचे पूर्ण कुटुंब एके काळी काँग्रेसमध्ये होते, भान राखावं, अशोक चव्हाणांकडून कानउघडणी

महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पती, शिवसेना मूक पत्नी कर काँग्रसे बिन बुलाए महमान आहे, असं वक्तव्य डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतच अहमदनगर येथे केलं होतं. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही त्यांची चांगलीच कानउघडणी केली.

Osmanabad | सुजय विखे पाटलांचे पूर्ण कुटुंब एके काळी काँग्रेसमध्ये होते, भान राखावं, अशोक चव्हाणांकडून कानउघडणी
सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याला अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 28, 2022 | 10:53 AM
Share

उस्मानाबादः पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि आता भाजपाचे असलेले खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी बोलताना भान राखावं. त्यांचे पूर्ण कुटुंबच एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. आता काँग्रेसवर बोलताना इतिहास लक्षात ठेवावा, राजकारणाचा वापर सकारात्मक कामासाठी करावा, अशी कानउघडणी काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. तुळजापूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पती, शिवसेना मूक पत्नी कर काँग्रसे बिन बुलाए महमान आहे, असं वक्तव्य डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतच अहमदनगर येथे केलं होतं. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही त्यांची चांगलीच कानउघडणी केली. यासोबतच केंद्र सरकार ज्या पद्धतीने राजकारण करतंय, ते लोकशाहीसाठी मारक आहे, अशी खंतही अशोक चव्हाण यांनी बोलून दाखवली.

सुजय विखे पाटलांची कानउघडणी

काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण उस्मानाबादेत म्हणाले, सुजय विखे अजूनही नवखे आहेत. राजकारणात नवे आहेत. ज्या काँग्रेसवर ते टीका करत आहेत, त्या काँग्रेसमध्ये एकेकाळी त्यांचे सर्व कुटुंबच होते. त्यामुळे त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा सकारात्मक भूमिका घ्यावी, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं.

‘आमदारांच्या घरांचा निर्णयच झाला नाही’

मुंबईत 300 आमदारांना घरे देण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावरून आरोपांचे रान पेटले असताना याबाबतही मोठं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. ते म्हणाले, आमदारांना घरे देण्याचा निर्णयच झालेला नाही. मुळात काँग्रेसच्या कोणत्याही आमदारांनी अशी मागणी केलेली नाही. असा कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे अंमलबजावणीचा प्रश्नच येत नाही, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

कुलदेवतेला काय साकडं?

उस्मानाबादेत देवी तुळजाभवानीचे अशोक चव्हाण यांनी सपत्नीक दर्शन घेतले. कुलदेवतेच्या दर्शनासाठी आम्ही दरवर्षी येत असतो. मात्र कोरोना संकटामुळे दोन वर्षे आमची परंपरा खंडली होती. आता देवीच्या दर्शनासाठी आलो असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. देवाला मी काय साकडं घातलं, हे सांगत नाही. पण महाराष्ट्राचं हित हा त्यातला गाभा आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं. ज्या सरकारच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत, त्यातून प्रगती साधली जावी, असं साकडं देवीला मागितल्याचं मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

इतर बातम्या-

Nashik Crime : नाशिकमध्ये बंद गाळ्यात मानवी अवयव सापडल्याने खळबळ

Chandrakant Patil : सरकार राष्ट्रवादी चालवते, शिवसेना-काँग्रेसच्या मंत्र्यांनी फक्त गाड्याच फिरवायच्या, चंद्रकांत पाटलांची टीका

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली