AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन् जिवात जीव आला… कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांचे रेस्क्यु ऑपरेशन; सर्वांची सुखरुप सुटका!

शनिवार असल्याने सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहनासाठी रवाना झाले होते. सकाळी 9 वाजल्यापासुन मात्र प्रचंड प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने गिर्यारोहक शिखराखाली उतरुन आले असता नदीच्या पाण्यामुळे बारी व जहागिरवाडी या ठिकाणी पोहचु शकत नव्हते.

अन् जिवात जीव आला... कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांचे रेस्क्यु ऑपरेशन; सर्वांची सुखरुप सुटका!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 10, 2022 | 12:13 PM
Share

अहमदनगर : अकोले तालुक्यातील महाराष्ट्राचे (Maharashtra) ऐवरेस्ट म्हणून ओळखले जाणारे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला पुर आला. पुरामुळे शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांची राजुर पोलिस स्टेशन (Police station) व जहागिरदार वाडीतील युवकांनी सुखरुप सुटका केली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखराच्या परिसरात शनिवारी सकाळपासुन अतिवृष्टी होत होती. शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपुर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने कृष्णावंती नदीला पूर (Flood) आला.

गिर्यारोहकांनी पोलिस हेल्पलाईन क्रमांक 112 ला फोन करत माहिती दिली

शनिवार असल्याने सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहनासाठी रवाना झाले होते. सकाळी 9 वाजल्यापासुन मात्र प्रचंड प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने गिर्यारोहक शिखराखाली उतरुन आले असता नदीच्या पाण्यामुळे बारी व जहागिरवाडी या ठिकाणी पोहचु शकत नव्हते. तेव्हा काही गिर्यारोहकांनी पोलिस हेल्पलाईन क्रमांक 112 ला फोन करत पुराच्या पाण्यामुळे अडकल्याची माहीती दिली. हा संदेश तातडीने राजुर पोलिस स्टेशनला प्राप्त होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळावर हजर झाले.

रेस्क्यु ऑपरेशन करून सुरक्षित बाहेर काढले

जहागिरदार वाडीतील काही व्यवसायिक, गाईड व गावकरी यांनी दोराच्या सहाय्याने नदीच्या पलिकडे अडकलेल्या गिर्यारोहकांना स्वत: नदीवरील एका केटीवेअरच्या ठिकाणी पाण्यात उभे राहत साखळी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. जवळजवळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे रेस्क्यु ऑपरेशन सुरच होते. संध्याकाळपर्यंत एकहजार गिर्यारोहकांची सुखरुप सुटका करण्यात पोलिस व गावक-यांनी बाजी मारली होती. या रेस्क्यु ऑपरेशन मध्ये राजुर पोलिसांकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस कर्मचारी अशोक गाढे, विजय फटांगरे व राकेश मुळाने सामिल झाले होते तर जहागिरदार वाडीतील युवकांची नावे समजु शकली नाहीत.

Follow Us
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला.
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र..
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र...
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र.
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान
मतदारांवर दबाव आणण्यासाठी... बंगाल निवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान.
विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला
विदर्भ होरपळला; अमरावतीत 46°C, सात वर्षांचा विक्रम मोडला.
मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?
मराठी सक्तीवरून मुंबईत राजकारण तापलं; मुंडेंचा मराठी माणसालाच इशारा?.