AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Youth Death : वैनगंगा नदीत अंघोळीला गेला अन् बुडून मेला, चंद्रपूरमध्ये तरुणाचा मृत्यू

अभिनव कुथे हा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी - आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या नदिघाट पुलाजवळील वैनगंगा नदी पात्रात आईसह गेला होता. यावेळी त्याची आईही नदीपात्रात थोड्या पाण्यात उभी होती तर अभिनव पाण्यात अंघोळीसाठी उतरला. गेले दोन दिवस वैनगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली असून पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिनव काही क्षणातच वैनगंगा नदी पात्रात दिसेनासा झाला.

Chandrapur Youth Death : वैनगंगा नदीत अंघोळीला गेला अन् बुडून मेला, चंद्रपूरमध्ये तरुणाचा मृत्यू
गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या मुलीचा बुडून मृत्यू
| Edited By: | Updated on: Feb 20, 2022 | 10:24 PM
Share

चंद्रपूर : आंघोळ करायला जाणे एका युवकांच्या जीवावर बेतले. चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी शहरालगत वैनगंगा (Wainganga) नदीपात्रात बुडून तरुणा (Youth)चा दुर्दैवी मृत्यू झाला. अभिनव दौलतराव कुथे (23) असे मयत युवकाचे नाव असून तो गडचिरोलीच्या आरमोरी येथील रहिवासी आहे. अभिनव आपल्या आईसोबत नदीपात्रात गेला होता. यावेळी पोहण्यासाठी अभिनव नदीपात्रात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अभिनव पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यंत्रणांनी प्राथमिक शोध मोहीम सुरू केली. अद्याप अभिनव सापडला नाही. (A young man drowned while bathing in Wainganga river in Chandrapur)

पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला

अभिनव कुथे हा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी – आरमोरी मुख्य महामार्गावर असलेल्या नदिघाट पुलाजवळील वैनगंगा नदी पात्रात आईसह गेला होता. यावेळी त्याची आईही नदीपात्रात थोड्या पाण्यात उभी होती तर अभिनव पाण्यात अंघोळीसाठी उतरला. गेले दोन दिवस वैनगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली असून पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिनव काही क्षणातच वैनगंगा नदी पात्रात दिसेनासा झाला. अभिनव बुडाल्याचे लक्षात येताच तात्काळ पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाला याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम सुरु केली.

मुंबईत वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेले दोन तरुण तलावात बुडाले

मुंबईतील कांदिवली पश्चिम चारकोप येथील श्री डिंगेश्वर तलावाजवळ वाढदिवसाची पार्टी करत असलेले दोन तरुण अचानक पाण्यात गेले आणि बुडाले. त्यापैकी एका तरुणाला वाचवण्यात यश आले तर दुसरा बुडाला. रविवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून चार तरुण तलावाजवळ पार्टी करत होते. तेव्हा एक तरुण पाण्यात गेला, त्याला पाण्यात बुडताना पाहून दुसरा तरुण त्याला वाचवण्यासाठी गेला, तोही बुडू लागला. मात्र त्याला वाचवण्यास यश आले. (A young man drowned while bathing in Wainganga river in Chandrapur)

इतर बातम्या

Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये माजी सैनिकाच्या घरी चोरी; सोन्याच्या दागिन्यांसह रिव्हॉल्वर चोरले

Nagpur Crime : नागपुरात उच्चशिक्षित युवतीकडून दुचाकींची चोरी, अशी फसली पोलिसांच्या जाळ्यात

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.