AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नियंत्रण सुटल्याने टेम्पो घुसला दुकानात; चार ते पाच दुकानांचे नुकसान, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

चंद्रपूरच्या भद्रावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने  भरधाव चारचाकी दुकानात घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये चार ते पाच दुकानांचे नुकसान झाले आहे.

नियंत्रण सुटल्याने टेम्पो घुसला दुकानात; चार ते पाच दुकानांचे नुकसान, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 9:23 AM
Share

चंद्रपूर : चंद्रपूरच्या भद्रावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने  भरधाव वाहन दुकानात घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये चार ते पाच दुकानांचे नुकसान झाले आहे. वरोरा वरून चंद्रपूरकडे जात असताना भद्रावतीमध्ये आल्यानंतर चालकाचे टाटा एस या वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुकानांमध्ये शिरली. हा अपघात भद्रावती बसस्थानक परिसरात घडला आहे.

दारूच्या नशेत अपघात

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित टेम्पो हा वरोरावरून चंद्रपूरकडे जात होता. भद्रावतीमध्ये आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीचा अपघात झाला. या घटनेतील चालक हा दारूच्या नशेत होता, दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला अंदाज आला नाही आणि गाडी दुकानात घुसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणात चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्यचाे पोलिसांनी म्हटले आहे.

…तर झाला असता अनर्थ

या अपघातामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहाणी झाली नाही, मात्र चार ते पाच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गाडीचे देखील नुकसान झाले. चालक हा नशेत असल्याने वाहनावरील ताबा सुटून ही घटना घडली. दरम्यान हा अपघात भद्रावती बसस्थानक परिसरात घडला आहे. या भागात कायमच वर्दळ असते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे. तसेच संबंधित चालकावर कडक कारवाई करवी अशी मागणी देखील काही नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

ओ शेठ… तुम्ही नादच केलाय थेट…’ शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्याच नेत्याने धरला ठेका; गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष

एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीची ऑफर, उद्या पुन्हा बैठक; अनिल परब यांची माहिती

Aurangabad: जायकवाडीत दुर्मिळ ‘युरेशियन कर्ल्यू’चं आगमन, जगात फक्त 7 हजार पक्षी शिल्लक

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.