AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचा मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्य सरकारला टोला; म्हणाले, प्रत्येक आमदाराला सांगतात…

मुंबईत १७ कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च केले. यांच्याच जाहिराती. यांचेचं फोटो. यांचाचं उदोउदो. डबळी एसटी होती. त्याखाली फोटो होते. असे फोटो शोभतात तरी का, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार यांचा मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्य सरकारला टोला; म्हणाले, प्रत्येक आमदाराला सांगतात...
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Mar 07, 2023 | 4:13 PM
Share

अहमदनगर : राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई दिली पाहिजे. यासाठी उद्या सभागृहात आवाज उठवणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगर येथे बोलताना सांगितलं. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले. अजित पवार म्हणाले, दोन रुपयांचा धनादेश दिला. हे संबंधित अधिकाऱ्याला दाखवलं. एस. एन. जावळे हा सोलापूरचा अडतव्यापारी होता. त्याचा परवाना निलंबित करण्यात आला. तू दोन रुपयांचा धनादेश दिला. आमची बदनामी झाली म्हणून निलंबित करण्यात आलं.

जाहिरातीसाठी किती खर्च

प्रत्येक आमदाराला सांगितलं जातं की तुला मंत्री करणार. पण, मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही. असं झालं तर आमदार निघून जातील, असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. प्रत्येक आमदाराला मंत्रीपदाचे आश्वासन कशासाठी असा प्रश्नही त्यांनी विचारला. एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकत्व आहे. ४० ते ५० कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले. पाच-सहा महिन्यात ५० कोटी रुपये जाहिरातीसाठी. मुंबईत १७ कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च केले. यांच्याच जाहिराती. यांचेचं फोटो. यांचाचं उदोउदो. डबळी एसटी होती. त्याखाली फोटो होते. असे फोटो शोभतात तरी का, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

कांद्याने केला वांदा

राज्य सरकार कापूस उत्पादकाला मदत करत नाही. हरभऱ्याची अशीच अवस्था आहे. कांद्याचा तर वांदा झाला आहे. दिल्लीत कांद्याचे भाव कमी-जास्त झाले. त्यामुळे दिल्लीचे सरकार गेले होते. जनतेने मनात आणल तर ते सरकारदेखील पाडू शकतात, असा इशारा अजित पवार यांनी दिला. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या माध्यमातून हा अधिकार तुम्हाला दिला आहे. लोकशाही टिकेल की, नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या बालेकिल्ल्यात जनतेने नाकारले असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. राज्य सरकारला यातून इशाराचं दिला आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश