AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचा मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्य सरकारला टोला; म्हणाले, प्रत्येक आमदाराला सांगतात…

मुंबईत १७ कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च केले. यांच्याच जाहिराती. यांचेचं फोटो. यांचाचं उदोउदो. डबळी एसटी होती. त्याखाली फोटो होते. असे फोटो शोभतात तरी का, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

अजित पवार यांचा मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्य सरकारला टोला; म्हणाले, प्रत्येक आमदाराला सांगतात...
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Mar 07, 2023 | 4:13 PM
Share

अहमदनगर : राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई दिली पाहिजे. यासाठी उद्या सभागृहात आवाज उठवणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगर येथे बोलताना सांगितलं. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अशी मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले. अजित पवार म्हणाले, दोन रुपयांचा धनादेश दिला. हे संबंधित अधिकाऱ्याला दाखवलं. एस. एन. जावळे हा सोलापूरचा अडतव्यापारी होता. त्याचा परवाना निलंबित करण्यात आला. तू दोन रुपयांचा धनादेश दिला. आमची बदनामी झाली म्हणून निलंबित करण्यात आलं.

जाहिरातीसाठी किती खर्च

प्रत्येक आमदाराला सांगितलं जातं की तुला मंत्री करणार. पण, मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही. असं झालं तर आमदार निघून जातील, असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. प्रत्येक आमदाराला मंत्रीपदाचे आश्वासन कशासाठी असा प्रश्नही त्यांनी विचारला. एका मंत्र्याकडे सहा जिल्ह्यांचं पालकत्व आहे. ४० ते ५० कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले. पाच-सहा महिन्यात ५० कोटी रुपये जाहिरातीसाठी. मुंबईत १७ कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च केले. यांच्याच जाहिराती. यांचेचं फोटो. यांचाचं उदोउदो. डबळी एसटी होती. त्याखाली फोटो होते. असे फोटो शोभतात तरी का, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

कांद्याने केला वांदा

राज्य सरकार कापूस उत्पादकाला मदत करत नाही. हरभऱ्याची अशीच अवस्था आहे. कांद्याचा तर वांदा झाला आहे. दिल्लीत कांद्याचे भाव कमी-जास्त झाले. त्यामुळे दिल्लीचे सरकार गेले होते. जनतेने मनात आणल तर ते सरकारदेखील पाडू शकतात, असा इशारा अजित पवार यांनी दिला. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या माध्यमातून हा अधिकार तुम्हाला दिला आहे. लोकशाही टिकेल की, नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या बालेकिल्ल्यात जनतेने नाकारले असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. राज्य सरकारला यातून इशाराचं दिला आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...