महापुरात शेती आणि जनावरांच्या गोठ्याचं नुकसान, 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

महापुरात शेतीचे झालेले नुकसान आणि जनावरांचे झालेले हाल सहन न झाल्याने नागठाणे ता. पलूस येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

महापुरात शेती आणि जनावरांच्या गोठ्याचं नुकसान, 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या
निलेश बाळकृष्ण पवार (वय 22) असं या आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 8:45 AM

सांगली : महापुरात शेतीचे झालेले नुकसान आणि जनावरांचे झालेले हाल सहन न झाल्याने नागठाणे ता. पलूस येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नागठाणे येथील गणेशनगर भागात बुधवारी ही घटना घडली.

निलेश बाळकृष्ण पवार (वय 22) असं या आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. भिलवडी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. महापुरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आता इथून पुढचं जीवन कठीण आहे, अशी सल मनात ठेऊन तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

महापुरात शेतीचं आणि जनावरांच्या गोठ्याचं नुकसान

कृष्णा नदीला मागील आठवड्यात महापूर आला आणि या महापुरात निलेशच्या ऊसाच्या शेतीचं आणि जनावरांच्या गोट्याचं फार मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तो फार नैराश्यात होता. बुधवारी तो जनावरांचा गोठा साफसफाई करण्यासाठी गेला होता. मात्र तो घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. काही वेळाने निलेशने याच शेडमध्ये गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी निलेशचे वडील बाळकृष्ण दशरथ पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मोठं कुटुंब, घरची परिस्थिती हालाखीची

निलेशच्या घरात आई वडील लहान भाऊ बहीण चुलते असे मिळून 10 जणांचे मोठं कुटुंब आहे. घरची परिस्थिती फारच गरिबीची आणि हालखीची आहे. लॉकडाऊनच्या काळात निलेशचे वडील गावोगाव फिरुन भाजीपाला विकण्याचे काम करीत होते. जनावरे आणि शेतीवरच या कुटुंबातील सर्वच उदरनिर्वाह करत होते आणि पोट भरत होते. या कुटुंबावर महापूर आल्यामुळे ऊसशेतीचे फार मोठे नुकसान झाले. आकाशवर आभाळ कोसळले होते. पण सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही. त्यामुळे निलेश फार निराश होता. शेवटी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत त्याने आपली जीवनयात्रा संपवली.

कर्ता पोरगा गेला, कुटुंबाला धक्का, गावावर शोककळा

या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील घरातील कर्ता मुलगा गेल्याने कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण गावावर या घटनेने शोककळा पसरली आहे. कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी चव्हाण आणि पागे करीत आहेत.

(Big Loss Agriculture And livestock Due to maharashtra Flood 22 year Old Farmer Commits Suicide)

हे ही वाचा :

VIDEO | बर्थडे सेलिब्रेशनच्या नावाखाली 33 केकची नासाडी, मुंबईतील टोळक्याची हुल्लडबाजी

पोलिसांच्या मारहाणीनंतर नागपुरात तरुणाची आत्महत्या, गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.