AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“संजय राऊत यांनी आणि खूप बोलावं”; राऊतांच्या बोलण्याचे भाजप नेत्याने फायदे सांगितले

संजय राऊत यांनी जास्तीत जास्त टीका करावी, त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होणार आहे. भाजपमधील प्रत्येक राजकीय नेत्यावर त्यांनी टीका करत असतात, मात्र त्याचा तोटा न होता, त्यांच्या टीकेमुळे भाजप जनसामान्यापर्यंत आणखी पोहचण्यास मदत होते, असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी आणि खूप बोलावं; राऊतांच्या बोलण्याचे भाजप नेत्याने फायदे सांगितले
| Updated on: May 04, 2023 | 7:30 PM
Share

अहमदनगर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा जोरदार सामना रंगला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होण्यास कारणीभूत खासदार संजय राऊत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होतो आहे. संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना भाजपचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे राज्यात भाजप जर मजबूत व्हायचे असेल तर खासदार संजय राऊत यांनी कायमस्वरुपी भाजपवर त्यांनी टीका केली.

त्यांच्यामुळेच राज्यातील भाजप मजबूत होत आहे असा उपरोधिक टोला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बोलण्यामुळेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागले होते. खरं तर त्यांच्यामुळेच राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

संजय राऊत सध्या भाजपवर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ टीका करत असतात. त्यामुळे त्यांच्याच टीकेचा फायदा भाजपला होता.

त्यामुळे त्यांनी भविष्यातही भाजपवर टीका करत राहावी, त्यामुळे त्याचा फायदाच आम्हाला होणार आहे असं मतही सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

संजय राऊत सातत्याने भाजपवर टीका करत असतात, मात्र त्यांनी टीका केल्यामुळे पक्षाला त्याचा तोटा होत नाही तर त्याचा फायदाच भाजपला होत आहे.

त्यामुळे संजय राऊत यांनी जास्तीत जास्त टीका करावी, त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होणार आहे. भाजपमधील प्रत्येक राजकीय नेत्यावर त्यांनी टीका करत असतात, मात्र त्याचा तोटा न होता, त्यांच्या टीकेमुळे भाजप जनसामान्यापर्यंत आणखी पोहचण्यास मदत होते, असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.