AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“संजय राऊत यांनी आणि खूप बोलावं”; राऊतांच्या बोलण्याचे भाजप नेत्याने फायदे सांगितले

संजय राऊत यांनी जास्तीत जास्त टीका करावी, त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होणार आहे. भाजपमधील प्रत्येक राजकीय नेत्यावर त्यांनी टीका करत असतात, मात्र त्याचा तोटा न होता, त्यांच्या टीकेमुळे भाजप जनसामान्यापर्यंत आणखी पोहचण्यास मदत होते, असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी आणि खूप बोलावं; राऊतांच्या बोलण्याचे भाजप नेत्याने फायदे सांगितले
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 04, 2023 | 7:30 PM
Share

अहमदनगर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा जोरदार सामना रंगला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होण्यास कारणीभूत खासदार संजय राऊत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होतो आहे. संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना भाजपचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे राज्यात भाजप जर मजबूत व्हायचे असेल तर खासदार संजय राऊत यांनी कायमस्वरुपी भाजपवर त्यांनी टीका केली.

त्यांच्यामुळेच राज्यातील भाजप मजबूत होत आहे असा उपरोधिक टोला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बोलण्यामुळेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागले होते. खरं तर त्यांच्यामुळेच राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

संजय राऊत सध्या भाजपवर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ टीका करत असतात. त्यामुळे त्यांच्याच टीकेचा फायदा भाजपला होता.

त्यामुळे त्यांनी भविष्यातही भाजपवर टीका करत राहावी, त्यामुळे त्याचा फायदाच आम्हाला होणार आहे असं मतही सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

संजय राऊत सातत्याने भाजपवर टीका करत असतात, मात्र त्यांनी टीका केल्यामुळे पक्षाला त्याचा तोटा होत नाही तर त्याचा फायदाच भाजपला होत आहे.

त्यामुळे संजय राऊत यांनी जास्तीत जास्त टीका करावी, त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होणार आहे. भाजपमधील प्रत्येक राजकीय नेत्यावर त्यांनी टीका करत असतात, मात्र त्याचा तोटा न होता, त्यांच्या टीकेमुळे भाजप जनसामान्यापर्यंत आणखी पोहचण्यास मदत होते, असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...