AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“संजय राऊत यांनी आणि खूप बोलावं”; राऊतांच्या बोलण्याचे भाजप नेत्याने फायदे सांगितले

संजय राऊत यांनी जास्तीत जास्त टीका करावी, त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होणार आहे. भाजपमधील प्रत्येक राजकीय नेत्यावर त्यांनी टीका करत असतात, मात्र त्याचा तोटा न होता, त्यांच्या टीकेमुळे भाजप जनसामान्यापर्यंत आणखी पोहचण्यास मदत होते, असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी आणि खूप बोलावं; राऊतांच्या बोलण्याचे भाजप नेत्याने फायदे सांगितले
| Updated on: May 04, 2023 | 7:30 PM
Share

अहमदनगर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा जोरदार सामना रंगला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होण्यास कारणीभूत खासदार संजय राऊत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होतो आहे. संजय राऊत यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिवसेना भाजपचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे राज्यात भाजप जर मजबूत व्हायचे असेल तर खासदार संजय राऊत यांनी कायमस्वरुपी भाजपवर त्यांनी टीका केली.

त्यांच्यामुळेच राज्यातील भाजप मजबूत होत आहे असा उपरोधिक टोला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बोलण्यामुळेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागले होते. खरं तर त्यांच्यामुळेच राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

संजय राऊत सध्या भाजपवर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ टीका करत असतात. त्यामुळे त्यांच्याच टीकेचा फायदा भाजपला होता.

त्यामुळे त्यांनी भविष्यातही भाजपवर टीका करत राहावी, त्यामुळे त्याचा फायदाच आम्हाला होणार आहे असं मतही सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

संजय राऊत सातत्याने भाजपवर टीका करत असतात, मात्र त्यांनी टीका केल्यामुळे पक्षाला त्याचा तोटा होत नाही तर त्याचा फायदाच भाजपला होत आहे.

त्यामुळे संजय राऊत यांनी जास्तीत जास्त टीका करावी, त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होणार आहे. भाजपमधील प्रत्येक राजकीय नेत्यावर त्यांनी टीका करत असतात, मात्र त्याचा तोटा न होता, त्यांच्या टीकेमुळे भाजप जनसामान्यापर्यंत आणखी पोहचण्यास मदत होते, असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.