AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारनं कोरोनाकाळात एक मास्क विकत घेतला नाही, चेक हातात घेऊन फिरले, सगळा पैसा केंद्रानं दिला, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

कोरोनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला.सगळा निधी केंद्राने दिला, यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही, केवळ चेक हातात घेऊन फिरत होते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

ठाकरे सरकारनं कोरोनाकाळात एक मास्क विकत घेतला नाही, चेक हातात घेऊन फिरले, सगळा पैसा केंद्रानं दिला, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
चंद्रकांत पाटील, उद्धव ठाकरे
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 05, 2021 | 12:23 PM
Share

कोल्हापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलातना महाविकास आघाडी सरकारवर कोरोनावरुन निशाना साधलाय. कोरोनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला.सगळा निधी केंद्राने दिला, यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही, केवळ चेक हातात घेऊन फिरत होते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

राज्यात मुख्यमंत्री बदलले काय?

राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते.शरद पवार कसे काय घोषणा करतात.उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांबाबात घोषणा केली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासह रस्त्यावर उतरू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र

संजय राऊत यांनी काय म्हणायचं हा त्यांचा निर्णय आहे. पोटनिवडणुकीत एकूण जागा जास्त भाजपनं जिंकल्या आहेत.संजय राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत. कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात, संपूर्ण पोशाख ते बघत नाहीत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. कलाबेन डेलकर यांचा विजय हा शिवसेनेचा विजय म्हणायचा का?, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला केला आहे. 2024 ला परिस्थिती बदलेल असं संजय राऊत म्हणाले होते त्यावर त्यावेळी काय करायचे ते जनता ठरवेल, असं पाटील म्हणाले.

राज्यानं पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत

केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पन्न शुल्क कमी केल्यानंतर राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कमी केले पाहिजेत, असं पाटील म्हणाले.14 राज्यांनी देखील दर कमी केले आहेत. महाराष्ट्र सरकारनं अजून निर्णयदेखील घेतलेला नाही. इंधनाबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही स्वागत करू असं पाटील म्हणाले. आम्ही कपटी नाही, पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

इतर बातम्या:

केंद्राने पेट्रोल डिझेल दरवाढ कमी केली, ठाकरे सरकार करणार का? शरद पवारांनी 5 शब्दात निकाल लावला!

गोविंदबागेतल्या पाडव्याला अजितदादांची दांडी, राज्यभरात चर्चेला उधाण, शरद पवारांनी खरं कारण सांगितलं!

Chandrakant Patil slam MVA Government said Union Government gave money during corona time

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?