AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Temperature | विदर्भ तापले, चंद्रपूर @ 45.4, राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; अॅक्शन प्लान काय?

चंद्रपूर शहरातील तापमान राज्यातील सर्वाधिक 45.4 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली. सातत्याने वाढणाऱ्या तापमानाचा मुकाबला करण्यासाठी मनपा प्रशासन सज्ज झालंय. दुपारच्या वेळेस अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन मनपाने केले आहे.

Chandrapur Temperature | विदर्भ तापले, चंद्रपूर @ 45.4, राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; अॅक्शन प्लान काय?
चंद्रपूरचे तापमान राज्यात सर्वाधिक.Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 7:02 PM
Share

चंद्रपूर : राज्यभरातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूर शहराची ओळख आहे. चंद्रपूर शहरात मनपा उष्माघातविरोधी आराखडा राबवत आहे. शहर मनपा हद्दीत उष्माघातापासून नागरिकांना बचावासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. शहरातील मनपा (Municipal Corporation) व जिल्हा रुग्णालयातील वॉर्डात रुग्णांसाठी कोल्ड वॉर्ड तयार केले गेले आहेत. दुपारच्या वेळेस अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन मनपाने केले आहे. शहरातील पार्क- बागांमध्ये दुपारच्या सुमारास विसाव्यासाठी मोकळीक दिली गेली आहे. शहरातील विविध भागात व चौकांमध्ये थंड पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. महाकाली यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत स्प्रिंकलर्सची सोय करण्यात आली. यामुळं काहिलीपासून दिलासा दिला जात आहे. चंद्रपूर शहरातील तापमान (Temperature) राज्यातील सर्वाधिक 45.4 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. म्हणूनच सातत्याने वाढणाऱ्या तापमानाचा मुकाबला करण्यासाठी मनपा प्रशासन (Administration) सज्ज झाल्याचं चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी सांगितलं.

विदर्भात पुढील आठवड्यातील तापमान?

नागपुरात आज 42.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन दिवसांनंतर पुढील आठवड्यात हे तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. चंद्रपुरातील तापमानही पुढील आठवड्यात 44 ते 45 अंशांपर्यंत जाणार आहे. अकोल्यात आज 42.6 तापमानाची नोंद झाली. यात पुढील आठवड्यात वाढ होणार आहे. अकोल्याचे तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

अकोला APMC तील RO मशीन बंद

अकोला जिल्हा हा हॉट जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. जिल्हात एप्रिल आणि मे महिन्यात ऊन खूप तापते. अंगाची लाही लाही होते. त्यामुळे APMC मध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी चोहोट्टा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांच्या स्थानिक विकास निधीतून शेतकऱ्यांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची मशीन लावण्यात आली. पण ही मशीन गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. ही RO मशीन लवकरात लवकर चालू करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

NCP Amol Mitkari : राष्ट्रवादीत चाललंय काय? अमोल मिटकरींच्या ज्या वक्तव्याला जयंत पाटील, धनंजय मुंडेंची दिलखुलास दाद, त्यावर राष्ट्रवादीचाच नेता म्हणतो, माफी माग

NCP Amol Mitkari : मिटकरीला माफी तर मागावीच लागेल, राष्ट्रवादीच्या परळीतल्या नेत्याची जाहीर पोस्ट, आमदारकीवरही भाष्य

Raj Thackeray | विरोध करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू, औरंगाबादेत मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रेंचा इशारा

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.