AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाघांची संख्या वाढली, मानवी मृ्त्यूचे काय?; चंद्रपुरात दर महिन्यात जातात इतके बळी

वाघाला पाहण्यासाठी जंगलात गर्दी केली जाते. हाच वाघ गावात येतो तेव्हा आक्रोश निर्माण होतो. शिवारात वाघ आल्यास लाठ्या-काठ्यांनी त्याचे स्वागत होते.

वाघांची संख्या वाढली, मानवी मृ्त्यूचे काय?; चंद्रपुरात दर महिन्यात जातात इतके बळी
| Edited By: | Updated on: Apr 10, 2023 | 1:37 PM
Share

चंद्रपूर : देशातील व्याघ्र संवर्धनाचा परिणाम म्हणजे नुकतीच वाघांची जाहीर झालेली आकडेवारी. देशात वाघांची संख्या समाधानकारकरीत्या वाढली असताना चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात गेल्या वर्षभरात 50 हून अधिक ग्रामस्थांचे मृत्यू झाले आहेत. एखाद्या व्याघ्र प्रकल्पापेक्षा अधिक वाघ ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रादेशिक जंगलात आढळले आहेत. याशिवाय गेल्या काही वर्षात कोळसा खाणी, औद्योगिक क्षेत्रे ,आयुध निर्माणी यासारख्या औद्योगिक आणि मुख्यत्वे शहरी भागातही वाघांचे नवे अधिवास निर्माण झाले आहेत.

वाघांबाबत नकारात्मक भावना

यातून गेली काही वर्षे वनव्याप्त क्षेत्रातील गावात कोरोनासारखा टायगर लॉकडाऊन बघायला मिळत आहे. यामुळे वाघांविरोधात नकारात्मक भावना निर्माण होत आहे. ज्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हजारो रुपये खर्च करून पर्यटक व्याघ्र सफारीसाठी येतात, त्याच वाघाचे ग्रामीण भागात लाठ्याकाठ्यांनी व प्रसंगी विषप्रयोगासारखी वागणूक दिली जाते.

चंद्रपुरात दर महिन्याला वाघाचे बळी

अशा स्थितीत वाघांची वाढती संख्या, त्यांच्यासाठीचे घटते जंगल, अतिक्रमण झालेले भ्रमण मार्ग याविषयी वनविभाग व प्रशासकीय पातळीवर व्यापक प्रयत्नांची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात दर महिन्याला तीन-चार वाघाचे बळी जातात. त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो.

हे चित्र बदलण्याची गरज

ईको प्रो वन्यजीव संघटनेचे अध्यक्ष बंडू धोतरे म्हणाले, वाघाला पाहण्यासाठी जंगलात गर्दी केली जाते. हाच वाघ गावात येतो तेव्हा आक्रोश निर्माण होतो. शिवारात वाघ आल्यास लाठ्या-काठ्यांनी त्याचे स्वागत होते.हे निर्माण झालेलं चित्र बदलण्याची गरज आहे.

समस्या सरकारी पातळीवर सोडवावी

कोरोनासदृश्य परिस्थिती गेल्या कित्येक दिवसांपासून वाघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये आहे. संबंधित गावकरी, शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत. वाघ-मानव संघर्षात नकारात्मक भावना वाघाच्या बदद्ल निर्माण झाली आहे. ही समस्या सरकारी पातळीवर सोडवली गेली पाहिजे.

वाघांचे स्थलांतर एका जंगलातून दुसऱ्या जंगलात होणे थांबले आहे. भ्रमणमार्गात विकासकामं झालीत. त्यामुळे वाघांनी अंडरपास किंवा ओव्हरपास मार्ग हवा आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाघांची संख्या वाढत असताना संघर्ष निर्माण झाला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.