AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola Temperature | अकोला तापमान वाढीवर उपाययोजनांसाठी चिंतन! जिल्हाधिकारी का गठीत करणार तज्ज्ञांची समिती?

अकोला जिल्ह्यानं तापमान वाढीचा उच्चांक गाठला. अकोला शहर व जिल्ह्यातही तापमान कमी राखणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कोणकोणत्या पर्यावरणीय उपाययोजना राबवाव्या, यासाठी लवकरच पर्यावरण तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती गठीत करण्यात येईल. तसेच येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवडीची व्यापक मोहीम राबविण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

Akola Temperature | अकोला तापमान वाढीवर उपाययोजनांसाठी चिंतन! जिल्हाधिकारी का गठीत करणार तज्ज्ञांची समिती?
अकोला येथील बैठकीत उपस्थित जिल्हाधिकारी व पदाधिकारी. Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 14, 2022 | 2:55 PM
Share

अकोला : जिल्ह्यातील वाढते व उच्चांकी तापमान ही साऱ्यांसाठीच चिंतेचा विषय आहे. याबाबत उपाययोजना राबविण्यासाठी व पर्यावरणीय उपचार अंमलात आणण्यासाठी काय करता येईल? याबद्दल विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी मागणी केली. त्या मागणीनुसार, जिल्हाधिकारी (Collector Nima Arora) यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपवनसंरक्षक के. अर्जून (Deputy Conservator of Forests K. Arjun), अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चिमणकर, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावने, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, हवामान केंद्राचे कार्तिक वानवे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे, मिलिंद शिरभाते, ए. एस. नाथन, उदय वझे, संदीप वाघाळकर, डॉ. संतोष सुरडकर, शरद कोकाटे, प्रभाकर दौंड, विशाल बोरे आदी उपस्थित होते. अकोला जिल्ह्यानं तापमान वाढीचा उच्चांक गाठला. अकोला शहर व जिल्ह्यातही तापमान कमी राखणे आवश्यक आहे.

लोकचळवळ आवश्यक

कोणकोणत्या पर्यावरणीय उपाययोजना राबवाव्या, यासाठी लवकरच पर्यावरण तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती गठीत करण्यात येईल. तसेच येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवडीची व्यापक मोहीम राबविण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. हा प्रश्न भावी पिढ्यांच्या हितासाठी सोडवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी लोक चळवळ उभी करणे आवश्यक आहे. सर्व घटकांनी सर्व भेद विसरुन एकत्र येणे काळाची गरज असल्याचे या बैठकीत मिटकरी म्हणाले. उपवनसंरक्षक अर्जून यांनी अकोला जिल्ह्यातील तापमानाच्या उच्चांकी वाढीमागील शास्त्रीय कारणे सांगितली.

वृक्षरोपनाची व्यापक मोहीम

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्याचे वृक्षआच्छादन वाढविणे गरजेचे आहे. वृक्ष रोपनाची व्यापक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. जमिनीची उपलब्धता करणे, ई- क्लास जमिनींची माहिती घेणे. त्यांच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करून लागवड करणे गरजेचे आहे. लावलेल्या वृक्षांच्या देखभालीसाठी मनरेगा योजनेतून मनुष्यबळ उपलब्ध करू द्यावे लागेल. भूजलस्तर उंचावणे, जलाशयांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. झाडांचे संरक्षण करणे याबाबत दीर्घकाळ उपाययोजना कशा करता येतील, यासाठी जिल्ह्यातील पर्यावरण तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येईल. दरमहा आढावा घेण्यात येईल, असे निर्देश ही यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा बैठकीत असलेल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Wardha Crime | वर्ध्यात ऐन विशीत, गुन्हेगारीच्या कुशीत! कारागृहात 25 टक्के बंदिवान 20 ते 35 वयोगटातील

Bhandara Crime | भंडाऱ्यात मुलीसोबत बोलण्याचा वाद, मिरचीपूड टाकून युवकाला संपविले, पाच जण अटकेत

Nitin Raut | तापमान वाढीमुळं विजेची मागणी जास्त, नागपुरात नितीन राऊत यांचं स्पष्टीकरण, केंद्र सरकारवर फोडलं भारनियमनाचं खापर

Follow Us
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण