AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

80 वर्षीय वृद्ध महिला बसली उपोषणाला; प्रशासनाची अशी उडाली भंबेरी

शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे.

80 वर्षीय वृद्ध महिला बसली उपोषणाला; प्रशासनाची अशी उडाली भंबेरी
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 11, 2023 | 1:57 PM
Share

धाराशिव : प्रशासन किती मुर्दाड असते. याचा प्रत्यय आज धाराशिव येथे आला. गेल्या १२ वर्षांपासून या महिलेची साधी मागणी पूर्ण केली नाही. शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे. महिलेचा आसा आरोप आहे की, शिवबांधावर एमएसईबी आणि संबंधितांनी संगनमत करून राजकीय दबाव निर्माण केला. बेकायदेशीररीत्या रोवलेले लाईटचे पोल काढण्यात आले. गट क्रमांक ७४ ला रस्ता देऊन संबंधित दोषींवर हद्दफोडीचा गुन्हा नोंदवण्यात यावी, अशी यांनी मागणी आहेत. या महिला ८० वर्षीय कलावती काशिनाथ जाधव आहेत.

प्रशासनाची उडाली भंबेरी

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तहसील कार्यालयाकडे अर्ज करूनी शेत रस्ता दिला जात नाही. असा आरोप करीत खुंटेवाडी येथील कलावती जाधव ही 80 वर्षीय वृद्ध महिला जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसल्या आहेत. गेल्या बारा वर्षापासून सलग शेत रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ही महिला आमरण उपोषणाला बसली आहे. महिलेने उपोषण सुरू करतात प्रशासनाची ही चांगलीच भंबेरी उडाली होती. उशिरापर्यंत महिलेने उपोषण मागे घ्यावा यासाठी प्रशासनाकडून विनवनी सुरू होती. आतापर्यंत लाईटली घेणारे प्रशासकीय कर्मचारी आता घाबरलेले दिसले. या महिलेचं उपोषणादरम्यान काही बरेवाईट झाल्यास काय होणार, अशी चिंता त्यांना सतावू लागली. त्यामुळे उपोषण मागे घेण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी महिलेला विनवनी करत आहेत.

शासकीय बाबूगिरी

आतापर्यंत त्यांनी प्रशासनाच्या दरबारी चपला झिजवल्या पण, प्रशासन काही नमत नव्हते. राजकीय दबाव काय असतो, हे या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासन आणि प्रतिनिधी सामान्य माणसांची परवड करत असतात. सामान्य लोकांसाठी न्याय मिळत नसल्याची ओरड नेहमी होत असते. हे त्याचे जीवंत उदाहरण आहे. सामान्य माणसाला त्रास देण्याचं काम शासकीय बाबूगिरी करत असते.

Follow Us
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! वारकऱ्यांचा संताप अनावर
Indrayani River | पालखीपूर्वी इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा! फेसाळलेल्या नदीने वारकऱ्यांचा संताप अनावर