VIDEO: साताऱ्यात कृष्णेचं पाणी थेट स्मशानभूमीत, मृतदेह निम्मी अर्धी जळालेल्या स्थितीत पाहून कर्मचाऱ्यांची धांदल

सातारा जिल्ह्यात संगम माहुली येथे कृष्णा नदीला आलेल्या पुराचं पाणी थेट कैलास स्मशानभूमीमध्ये शिरलं आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार होत असलेले निम्मी अर्धी जळालेले मृतदेह पाहून कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली.

VIDEO: साताऱ्यात कृष्णेचं पाणी थेट स्मशानभूमीत, मृतदेह निम्मी अर्धी जळालेल्या स्थितीत पाहून कर्मचाऱ्यांची धांदल
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 11:45 PM

सातारा : कोकणानंतर पुराने पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय. साताऱ्यासह अनेक कोल्हापूर, सांगली भागात पुराचं पाणी घरात घुसून अनेक लोक बेघर झालेत. अनेक लोक पाण्यात फसलेत. त्यांना युद्धपातळीवर वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता सातारा जिल्ह्यात संगम माहुली येथे कृष्णा नदीला आलेल्या पुराचं पाणी थेट कैलास स्मशानभूमीमध्ये शिरलं आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार होत असलेले निम्मी अर्धी जळालेले मृतदेह पाहून कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली.

साताऱ्यातील संगम माहुली येथे अचानक स्मशानभूमीत पाणी आल्यानं नुकताच अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांपर्यंत पाणी पाहचलं. त्यामुळे निम्मे अर्धे जळालेले मृतदेह पाहून येथील कर्मचाऱ्याची धांदल उडाली. पुराच्या पाण्यानं जळणारे मृतदेह विझण्याची शक्यता आहे. मात्र, व्यवस्थापन या मृतदेहांवरील अंत्यसंस्कार पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहे. असं असलं तरी पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने त्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे.

साताऱ्यात आंबेघर गावात दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू

साताऱ्यातील आंबेघर गावात दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं आहे. मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.

15 घरांवर दरड कोसळल्याची शक्यता

गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यात मोठा पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. यापूर्वी कधीच असा पाऊस कोसळला नव्हता आणि पूरही आला नव्हता, असं राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. आतापर्यंत आंबेघर गावात 12 जणांचा दरड कोसळून मृत्यू झाला आहे. एकूण 15 घरे या दरडीखाली दबल्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू असल्याचं देसाई यांनी सांगितलं.

हेही वाचा :

Maharashtra Flood : महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Satara Landslide: साताऱ्यात आंबेघर गावात दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू

साताऱ्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या 2 घटना, देवरुखवाडीवर दरड कोसळली, पाटणच्या आंबेकरमधील काही घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली

व्हिडीओ पाहा :

Flood water in Cemetery graveyard of Sangam Mahuli Satara

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.