AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा; या शेतपिकांचे झाले नुकसान, कुठे काय परिस्थिती?

काही ठिकाणी झाडं रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. चिंचपूर येथील शाळेचे छत उडाले. रात्रीची वेळ असल्यानं थोडक्यात निभावले.

पश्चिम विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा; या शेतपिकांचे झाले नुकसान, कुठे काय परिस्थिती?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 01, 2023 | 9:36 AM
Share

अकोला : अमरावती विभागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला (Akola) जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी झाडं रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिंचपूर येथील शाळेचे छत उडाले. रात्रीची वेळ असल्यानं थोडक्यात निभावले. शाळेची वेळ राहिली असती तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असते. नादुरुस्त शाळा दुरुस्त करणे आवश्यक आहे. याकडे जिल्हा परिषदेने (zp school) लक्ष द्यावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

फळा-फुलांचे मोठे नुकसान

अकोला जिल्हातल्या पातूर तालुक्यातल्या आगीखेड, खामखेड शिवारात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने शुक्रवारी संध्याकाळी हजेरी लावली. त्यामुळे कांदा बीजोत्पादन, उन्हाळी पीक, फळ आणि फूल पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाऱ्याचा जोर जास्त असल्याने रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे या वादळी वाऱ्यासह या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा संघटना सापडलाय.

वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला

दुसरीकडं, बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आधीच बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 7 हजार 115 शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र काल पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजवला आहे. खामगाव तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिला आहे.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पावसाने रडवल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळतंय. वादळी वाऱ्यामुळे चिंचपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडून शाळेच्या इमारतीचे मोठ नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची चांगलीच उडाली तारांबळ

वारा एवढा जोरदार होता की, काही झाडं उन्मळून पडली. सोसाट्याच्या वाऱ्यात काही वस्तू उडून गेल्या. काही ठिकाणी टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडला. कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेला माल झाकून ठेवावा लागता. शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस सुरू होताच लोकांनी घरचा रस्ता धरला.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय