Nanded Rain | नांदेड जिल्हात पावसाचा हाहा:कार अनेक गावांचा संपर्क तुटला, शहरातील रस्ते पाण्याखाली…

नांदेड जिल्हात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने प्रशासन अॅलर्ट मोडवर होते. अनेक गावाना जोडणाऱ्या या रस्त्याच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केलीयं. नदीला थोडा जरी पुर आला की, संपूर्ण रस्ताच पाण्याखाली जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो.

Nanded Rain | नांदेड जिल्हात पावसाचा हाहा:कार अनेक गावांचा संपर्क तुटला, शहरातील रस्ते पाण्याखाली...
Reporter Rajiv Giri | Edited By: | Updated on: Aug 05, 2022 | 8:24 AM

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) काल झालेल्या मुसळधार पावसाने नायगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. पळसगांव, टाकळगाव, ताकभिड या गावांचा संपर्क तुटला होता तर देगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी (Water) आले होते. त्यामुळे संध्याकाळी घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह असंख्य शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागलाय. थोड्याश्या पावसाने (Rain) इथल्या रस्त्यावर पाणी साचत असल्याने हा रस्ता पावसाळयात डोकेदुखी बनलाय. त्याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही काहीही उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

नांदेड जिल्हात मुसळधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला

नांदेड जिल्हात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने प्रशासन अॅलर्ट मोडवर होते. अनेक गावाना जोडणाऱ्या या रस्त्याच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केलीयं. नदीला थोडा जरी पुर आला की, संपूर्ण रस्ताच पाण्याखाली जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना पावसानंतर आपले घर गाठण्यासाठी मोठी तारेवरची कसरत नेहमीच करावी लागते. ग्रामस्थांनी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी अनेकदा प्रशासनाकडे केलीयं. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते.

हिंगोली गेट भुयारी पुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक बंद

नांदेड शहरात कालपासून जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे शहरातील अनेक पूल पाण्यात बुडाले आहेत. हिंगोली गेट इथल्या रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलायं. त्यासोबतच अनेक भुयारी पुलाखाली पाणी साचलेले आहे. शहरात यावर्षी नालेसफाई झालीच नसल्याने सखल भागातील अनेक घरांत पाणी शिरून सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झालेय. दरवेळी प्रमाणे यंदाही महापालिकेने पावसापूर्वी नालेसफाई केल्याचा दावा केला होता. मात्र, पावसामध्ये शहरातील अनेक नाले तुंबल्याचे चित्र आहे. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Follow Us