AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Rain : वर्ध्यात पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळून दोघांचा मृत्यू, तर दोघे पुरात गेले पुरात वाहून

Wardha Rain : वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्याच्या पुलगाव येथील रामटेके लेआउट मध्ये 62 वर्षीय सुमन अरुणराव गजामे ही महिला शेतातून येत असतांना नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. काही अंतरावरच तिचा मृतदेह आढळला.

Wardha Rain : वर्ध्यात पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळून दोघांचा मृत्यू, तर दोघे पुरात गेले पुरात वाहून
वर्ध्यात पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळून दोघांचा मृत्यूImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 10, 2022 | 7:43 AM
Share

वर्धा : वर्धा जिल्ह्यात (Wardha Rain) काल दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. तब्बल तीन तास आलेल्या पावसाने (Rain) जिल्ह्यात कहर माजावला. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालं आहे. ओढे आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. या जोरदार पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पूर आल्याने नाल्याच्या पाण्यात दोघे वाहून गेले आहेत. वाहून गेलेल्या दोघांपैकी एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. तर दुसऱ्याचा शोध (Rescue Operations) सुरू आहे. आलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेती सुद्धा पाण्याखाली गेली असल्याच प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अवघ्या तीन तासाच्या या पावसामुळे प्रचंड दाणादाण उडाल्याने स्थानिक नागरिक भयभती झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे.

वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्याच्या पुलगाव येथील रामटेके लेआउट मध्ये 62 वर्षीय सुमन अरुणराव गजामे ही महिला शेतातून येत असतांना नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. काही अंतरावरच तिचा मृतदेह आढळला. तर देवळी तालुक्यातीलच पिपरी खराबे येथील देवानंद किनाके हे जनावरे चरावायला गेले होते. परत येताना नाल्याला आलेल्या पुरात ते वाहून गेले असून त्यांचा शोध सुरु आहे. तर हिंगणघाट नांदगाव येथे शेतात काम करत असतांना वीज कोसळल्याने 36 वर्षीय गीता मेश्राम या महिलेचा मृत्यू झाला आहे. वर्धा तालुक्यातील कुरझडी श्रीराम शेंडे यांचा सुद्धा वीज कोसळल्याने मृत्यू झालाय. काल आलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या सर्व भागातील नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुरामुळे मजूर अडकले

जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. पुलगाव रोडवरील धोत्रा नदीला पूर आल्याने दहा मजूर अडकले आहेत. घटनास्थळी सावंगी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे आणी तहसीलदार रमेश कोळपे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मजुरांना सुरक्षित काढण्याकरीता उपाययोजना करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. शेताततून परत येत असतांना अचानक पाणी वाढल्याने अनेक मजूर अडकले होते. त्यामुळे मजुरांनी नदी शेजारील उंच जागेवर उभे राहून स्वत:चा बचाव केला.

विद्यार्थी अडकले, शेतीचं तळं झालं

समुद्रपुर तालुक्यात काल सकाळपासून झालेल्या पावसामुळे मांडगाव येथे पूर आला असून मांडगाव व पेठ येथील संपर्क तुटला आहे. सकाळपासून शाळकरी विद्यार्थी पुरात अडकले असून घरी जाण्यासाठी पाणी ओसारण्याची वाट पाहत होते. 2 तासात झालेल्या पावसाने इतक्या मोठ्या प्रमाणात पूर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शेतीचे सुद्धा फार नुकसान झाले असून शेतात पाण्याचे तळे साचले आहे .प्रवीण चांदनखेडे, उमेश कळमकर, गोपाल डफ, रत्नाकर ऐंडे याच्या शेतात पाणी साचून तळे साचले आहे. तर मांडगाव काही घरात सुद्धा पाणी घुसले आहे.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन