AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उजनीच्या धरणातील पाण्याचा आदेश रद्द, जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा निर्णय

उजनी धरणातून इंदापूरला जाणाऱ्या पाण्याचा आदेश रद्द करण्यात आलाय. स्वतः राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतलाय.

उजनीच्या धरणातील पाण्याचा आदेश रद्द, जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा निर्णय
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
| Updated on: May 19, 2021 | 3:04 AM
Share

सोलापूर : उजनी धरणातील पाण्याचा आदेश रद्द करण्यात आलाय. स्वतः राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतलाय. उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवले जात असल्याचा आरोप होत होता. यावरुन इंदापुरचे आमदार तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात सोलापुरात अनेक आंदोलनंही झाली. सोलापुरातल्या लोकप्रतिनिधींनीही याला मोठा विरोध केला. त्यानंतर आज (18 मे) अखेर जयंत पाटील यांनी तो आदेश रद्द केला. यावेळी त्यांनी संबंधित आदेश केवळ सर्वेक्षणाचा होता. मात्र, त्याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याने आदेश रद्द केल्याचं मत व्यक्त केलं (Jayant Patil order to canceled gr on Indapur Ujani dam water distribution).

जयंत पाटील म्हणाले, “सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय मामा शिंदे, यशवंत माने यांच्यासह शिष्टमंडळाने माझी भेट घेतली. सोलापूर जिल्ह्याच्या सध्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी भूमिका मांडली. सोलापूर जिल्ह्याच्या उजनीच्या जलाशयातून पाणी सोलापूर जिल्ह्याला वाटप केलेले आहे. त्यातल्या एकाही थेंबाला धक्का लागणार नाही. शासनाकडून 22 एप्रिलला एक सर्वेक्षणाचा आदेश निघाला होता. त्याबाबत बरेच गैरसमज झालेले आहेत. त्यामुळे मी ते आदेश रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”

“सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला असणाऱ्या पाण्याचा कोणताही संबंध येणार नाही अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी कोणताही गैरसमज होऊ देऊ नये, अशी माझी विनंती आहे. सर्वांनी एकत्रितपणे विचार केलेला आहे,” असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

आघाडीतील महामंडळ जागावाटपाचं काय झालं?

जयंत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज वेगवेगळ्या विषयांवर बैठक आणि चर्चा झाली. चर्चेच्या प्रक्रियेप्रमाणे दोन-तीन आठवड्यांनी यबाबतीत चर्चा झाली. महामंडळ आणि जागावाटपाचे काम चालले आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख यांनी आज येथे बसून चर्चा केली.”

हेही वाचा : 

सोलापूरचं पाणी आधी बारामती, आता इंदापूरला पळवलं, राष्ट्रवादी पाणी चोर, भाजपचा हल्ला; वाचा काय आहे वाद

उजनी धरणात मांगूरनंतर आता घातक ‘सकर’ माशाची भर, मच्छिमारांच्या जाळ्यांचेही नुकसान

उजनीचं पाणी मराठवाड्याला देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध

व्हिडीओ पाहा :

Jayant Patil order to canceled gr on Indapur Ujani dam water distribution

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.