AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यादेखत 220 पाळीव डुकरे, 200 किलो काजू चोरटे सगळचं केलं लंपास; कुटुंबीयांकडे हताशपणे पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता..

गुरव कुटुंबीयांतील सदस्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे गुरव कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर शेजाऱ्यांचे गुरव यांच्या घराकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी त्यांची सोडवणूक केली.

डोळ्यादेखत 220 पाळीव डुकरे, 200 किलो काजू चोरटे सगळचं केलं लंपास;  कुटुंबीयांकडे हताशपणे पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता..
| Edited By: | Updated on: Apr 12, 2023 | 5:34 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये खानापूर पैकी रायवाडा येथे एकाच कुटुंबातील तिघांना दोरीने बांधून घालून अज्ञात 25 जणांच्या टोळीने दरोडा घातला आहे. यामध्ये चोरट्यांच्या टोळीने चक्क 220 डुकरे आणि रोकड पळवली आहेत. ही घटना रात्री तीनच्या सुमारास चिरका नावाच्या शेतात घडली आहे. चोरट्याने रात्री दहशत माजवत दरवाजे तोडले. प्रल्हाद राजाराम गुरव, पूनम प्रल्हाद गुरव व राजेश प्रल्हाद गुरव या तिघांना मारहाण करीत बांधून घातले. तोंडाला बांधल्यामुळे त्यांना आरडाओरडाही करता आला नाही. यावेळी साईडच्या राहणाऱ्या कोरवी यांनी त्यांना सोडविले.

यावेळी चोरट्यांनी 220 पाळीव डुकरे, 200 किलो काजूगर, सोने चांदी व दोन मोबाईल यासह अन्य घरगुती अंदाजे 9 लाख 17 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.

चोरट्यानी केलेल्या मारहाणीत प्रल्हाद गुरव, पूनम गुरव व राजेश गुरव जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे हे श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र श्वान घराभोवतीच घुटमळले. या चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात मोठी जबरी चोरी झाल्यामुळे आजऱ्यासह चंदगड, भुदरगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आजरा तालुक्यातील खानापूर पैकी रायवाडा येथे एकाच कुटुंबातील तिघांना दोरीने बांधून घालून ही चोरी आणि मारहाण करण्यात आली आहे.  या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून पोलिसांची तपास पथकं रवाना झाली आहेत.

गुरव कुटुंबीयांतील सदस्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे गुरव कुटुंबीयांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर शेजाऱ्यांचे गुरव यांच्या घराकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी त्यांची सोडवणूक केली.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.