AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..तर हेच खाऱ्या पाण्याचे टँकर दिल्लीत घेऊन जाऊ, नितीन देशमुख यांचा आता थेट केंद्रालाच इशारा

खारपान पट्ट्यासाठी उद्धव ठाकरे यांनी २२९ कोटी रुपये मंजूर केले होते. प्रशासकीय मान्यता झाली. ६५ टक्के काम पूर्ण झाले.

..तर हेच खाऱ्या पाण्याचे टँकर दिल्लीत घेऊन जाऊ, नितीन देशमुख यांचा आता थेट केंद्रालाच इशारा
| Edited By: | Updated on: Apr 20, 2023 | 10:48 PM
Share

अकोला : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना सकाळी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी त्यांना पोलिसांनी अकोल्यात आणून सोडले. आमदार नितीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आंदोलन दडपण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना पुढे केल्याचा आरोप केला आहे. माझा जीवाला धोका असल्याचा आरोपही आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे आंदोलन आहे. यानंतर हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.

अकोल्यात महामोर्चा काढणार

सरकारने स्थगिती उठविली नाही तर आम्ही हेच खाऱ्या पाण्याचे टँकर दिल्ली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी घेऊन जाऊ. असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात अकोल्यात महामोर्चा काढणार असल्याचेही देशमुख म्हणाले.

खारपान पट्ट्यासाठी उद्धव ठाकरे यांनी २२९ कोटी रुपये मंजूर केले होते. प्रशासकीय मान्यता झाली. ६५ टक्के काम पूर्ण झाले. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्वाचे राजकारण करतात. भाजपच्या एका आमदाराने पत्र दिलं म्हणून त्या कामावर स्थगिती दिली.

लोकं खारं पाणी पितात

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी संपूर्ण जनतेचा विचार केला पाहिजे. एका आमदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी स्थगिती दिली. या भागातील हजारो लोकं पायी चालत नागपूरला गेले. या भागातील लोकं खारं पाणी पितात. बाळ जन्माला आल्यानंतर आईला खारं पाणी पाजावं लागते.

टँकरमध्ये पाणी आणलं होतं

या खाऱ्या पाण्यामुळे किडन्या खराब होतात. पूर्वजांच्या किडन्या या खाऱ्या पाण्यामुळे खराब झाल्या आहेत. ६९ खेड्यातील लोकांनी लोटा लोटा पाणी जमा करून ते टँकरमध्ये टाकलं. ते पाणी घेऊन आम्ही नागपूरला आलो. ते पाणी पिऊन बघावं. त्या पाण्याने आंघोळ करावी, ही आमची विनंती होती.

फडणवीस हे हिंदुत्वाचे राजकारण करतात. त्यामुळे त्यांनी या आंदोलनाची दखल घेणे आवश्यक होतं. पण, तसे त्यांनी केले नाही. आम्ही आणलेले पाणी त्यांनी पाहिले नाही. उलट पोलिसांना प्रचंड दबाव आणला, असा आरोप नितीन देखमुख यांनी केला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.