AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही पाय अपंग, ठरवलं भीक मागायचं नाही, अपंग युवकाची प्रेरणादायी कहाणी

दोन्ही पाय नसताना एका युवकानं मोठा निर्णय घेतला. काहीही झालं तरी भीक मागायची नाही. पाय नसले म्हणून काय झालं. जे जमेल ते काम करायचं.

दोन्ही पाय अपंग, ठरवलं भीक मागायचं नाही, अपंग युवकाची प्रेरणादायी कहाणी
| Edited By: | Updated on: May 03, 2023 | 1:36 PM
Share

नांदेड : बहुतेक युवकांचा शेतकडं पाहण्याचा दृष्टिकोण नकारात्मक आहे. पण, काही तरुण अजूनही शेतीतून चांगले उत्पन्न घेतात. धडधाकट तरुण शेतीकडं पाठ फिरवतात. पण, दोन्ही पाय नसताना एका युवकानं मोठा निर्णय घेतला. काहीही झालं तरी भीक मागायची नाही. पाय नसले म्हणून काय झालं. जे जमेल ते काम करायचं. घरी शेती होती. त्या शेतीत पाणी नव्हतं. तरीही त्याने हार मानली नाही. तीन एकर शेतीतून त्यानं समाजासमोर एक आदर्श घालून दिला.

दोन बहिणींचे विवाह लावले

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चोरंबा इथल्या दोन्ही पायांनी अपंग असलेल्या चंद्रकांत नरोटे या युवकाने जिद्दीने शेती फुलवलीय. चंद्रकांत शेतीतील सगळी कामे स्वतः करत असून अवघ्या तीन एकर क्षेत्रात तो लाखोंचे उत्पन्न मिळवतोय. स्वतःच्या मेहनतीच्या बळावर या अपंग युवकाने दोन बहिणीचे विवाह लावून दिलेत.

दूध विक्रीचाही व्यवसाय करतो

आता तिसऱ्या बहिणीच्या लग्नाची तो तयारी करतोय. सरकारकडून मिळालेल्या तीनचाकी वाहनांचा वापर करत सकाळच्या सत्रात तो दूध विक्रीचा देखील व्यवसाय करतो. धडधाकट असलेल्या तरुणाने आदर्श घ्यावा, अशी या अपंग युवकाची प्रेरणादायी कहाणी आहे.

Chandrakant 2 n

प्लाट खरेदी करून घर बांधलं

चंद्रकांत नरोटे म्हणतो, बारावीपर्यंत शिक्षण झालं. शेतातील जमिनीत पाणी नव्हतं. तरीही शेती करायची ठरवली. भीक नाही मागायची, हे मनात ठासलं. २०१२ पासून शेती करतो. त्यातून गरजेपुरते पैसे मिळतात.

चंद्रकांतकडे तीन एकर शेतजमीन. या जमिनीच्या भरोशावर दोन बहिणींचे लग्न केलं. एक प्लाट खरेदी करून घर बांधलं. मी दोन्ही पायांनी अपंग असून एवढं केलं. पायवाल्यांनी हार मानायची नाही, असा संदेश चंद्रकांत नरोटे देतो.

चंद्रकांत नरोटे तीनचाकी गाडीने शेतात जातो. गवत कापतो. म्हशीला चारा टाकतो. दूध काढतो आणि दुधविक्रीचा व्यवसायही करतो. हे सारं दोन पाय नसलेल्या युवकाला जमतं. मग, पाय असलेल्यांना का करू नये, असा प्रश्न चंद्रकांत नरोटे याला पडतो.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.