AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबारमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा, आधी इंटरनेटचा गोंधळ, त्यात आता पुस्तक नाही

इंटरनेट सेवा नसल्याने अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अनेक शिक्षक हे गाव पाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

नंदुरबारमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा, आधी इंटरनेटचा गोंधळ, त्यात आता पुस्तक नाही
फोटो प्रातनिधिक
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 4:06 PM
Share

नंदुरबार : राज्यात शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरुवात होते. मात्र महिना उलटून देखील नंदुरबार जिल्ह्यात अद्याप विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक मिळालेले नाही. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात नेटवर्क कम्युनिकेशनच्या मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण देणे आणि घेणे अवघड होत आहे. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. (Nandurbar District Education books Not available After the start of this academic year)

इंटरनेट सेवा नसल्याने मुलं शिक्षणापासून वंचित

नंदुरबार जिल्हा हा सातपुड्याच्या डोंगररांगात वसलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी इंटरनेट सेवेबाबत मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र इंटरनेट सेवा नसल्याने अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अनेक शिक्षक हे गाव पाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यायचे?

मात्र यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तक मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे कसे असा प्रश्न आता समोर येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात 65 टक्के आदिवासी आहेत. त्यामुळे शिक्षणाचे प्रमाण फार कमी आहे. तरीदेखील राज्य शासन या गोष्टीकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

अद्याप पुस्तक नाही

शैक्षणिक वर्ष सुरु होऊन एक महिना उलटून गेला आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक मिळाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुस्तकांसाठी वरिष्ठ पातळीवर कळवण्यात आले आहे. मात्र अद्याप पुस्तक मिळाले नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यासाठी शासनाने आणि शिक्षण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशीच अपेक्षा विद्यार्थ्यांनी पालकांकडून केली जात आहे.

(Nandurbar District Education books Not available After the start of this academic year)

संबंधित बातम्या : 

मोरबे धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणातील पाणीसाठा 62% टक्के, नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटतीय!

VIDEO | अंबरनाथमध्ये दोन प्रवाशांसह निघालेल्या रिक्षावर झाड कोसळलं

Aurangabad | काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधातील ‘ते’ आंदोलन परवानगीविना, अमित देशमुखांना वगळून इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.