AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकर ‘या’ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार; तर आठवले यांना लोकसभेच्या किती जागा?

एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी घोषित केल्यानंतर आता दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवलेही लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत.

प्रकाश आंबेडकर 'या' मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार; तर आठवले यांना लोकसभेच्या किती जागा?
ramdas athawaleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2023 | 9:11 AM
Share

अकोला | 13 ऑगस्ट 2023 : लोकसभा निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. त्यामुळे सर्वच प्रस्थापित पक्ष कामाला लागले आहेत. एकीकडे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तर दुसरीकडे भाजपने एनडीएचं पुनरुज्जीवन केलं आहे. त्यामुळे देशात 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. एकीकडे बड्या आणि प्रस्थापित राजकीय पक्षांनी ही मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच दुसरीकडे छोटे राजकीय पक्षही कामाला लागले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुका कधीही लागू शकतात यासाठी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेसाठी आपली उमेदवारी अकोल्यातून जाहीर केली आहे. आपण अकोल्यातून लढणार आहोत. भाजप आणि आरएसएसच्या उमेदवाराला पराभूत करून निवडणुका जिंका, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

वंचितच्या उमेदवारांना विजयी करा

देशातील परिस्थिती बदलायची असेल तर भाजपचा पराभव केलाच पाहिजे. म्हणून वंचित आघाडीच्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकर यांची ठाकरे गटासोबत युती आहे. या युतीची जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. त्याआधीच प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून त्यांची उमेदवारी घोषित केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

प्रकाश आंबेडकर यांनी गेल्यावेळी सोलापूर आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघात त्यांचा पराभव झाला होता. यावेळी त्यांना चांगली मते मिळाली होती. त्यांनी अधिक मते घेतल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता.

आठवलेंना शिर्डीतून लढायचंय

एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी घोषित केल्यानंतर आता दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवलेही लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातून लोकसभेच्या दोन जागा मागितल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. जेपी नड्डा यांच्यासोबत माझे बोलणे झाले असून दोन जागा मिळतील अशी आमची अपेक्षा आहे, असं मत रामदास आठवले व्यक्त केल आहे.

त्याच बरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची इच्छा देखील आठवले यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या दरम्यान NDA च्या बैठकीत मी हे मुद्दे मांडणार असल्याचेही ते म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.