AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे-बंगळुरु हायवे जड वाहनांसाठी खुला, तर मुंबई-गोवा महामार्गावरही ठरावीक वाहतूक सुरु

तुफान पावसाने बंद झालेली वाहतूक आता हळूहळू सुरु होत आहे. पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद होती.

पुणे-बंगळुरु हायवे जड वाहनांसाठी खुला, तर मुंबई-गोवा महामार्गावरही ठरावीक वाहतूक सुरु
Pune Banglore Highway Kolhapur
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 1:59 PM
Share

कोल्हापूर/रायगड : तुफान पावसाने बंद झालेली वाहतूक आता हळूहळू सुरु होत आहे. पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद होती. अखेर या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहने पुढे सोडण्यात आली. तर तिकडे कोकणात मुंबई-गोवा महामार्गावरील खचलेला ब्रिटिशकालीन पुन्हा भराव टाकून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. चिपळूण येथील बहादूर शेख नाक्याजवळ वाशिष्टी नदीवरील खचलेल्या पुलावर भराव टाकून पूल दुरुस्थ करण्यात आला.

कोल्हापुरात पाणी ओसरण्यास सुरुवात

दोन दिवसांच्या व्यत्ययानंतर कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरील पूल सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. अत्यावश्यत सेवेतील कर्मचारी, साहित्यांची वाहतूक करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे कोल्हापुरातील विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद होती. अखेर या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली. आज प्राथमिक चाचणीनंतर जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील आणि जड वाहन महामार्गावरून मार्गस्थ केली. महामार्ग बंद असल्यामुळे गेल्या चार दिवसापासून हजारो वाहन आणि त्यांचे चालक प्रवासी अडकून पडले होते. आज महामार्ग सुरू होताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू झाली असून सध्या फक्त पेट्रोल, डिझेल, गॅस त्याचबरोबर इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पुढे सोडल जातं आहे. दरम्यान पाणी कमी होत असलं तरी त्याचा प्रवाह अद्याप कायम असल्याने छोटी वाहने आणि दुचाकी वाहनांना मात्र अद्याप या मार्गावरून सोडलं जात नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक

चिपळूणजवळ मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. बहादूर शेख येथील वाशिष्टी नदीवरील खचलेल्या पुलावर भराव टाकून पूल पुन्हा रिपेअर करण्यात आला. पाच दिवसांनी पुन्हा एकदा वाहतूक सुरू झाली. 8 फूट उंचीच्या वाहनांना सद्या परवानगी दिली आहे.

VIDEO : पुणे-बंगळुरु महामार्ग चार दिवसांनी सुरु

संबंधित बातम्या  

अखेर पाच दिवसानंतर तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं; बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याची मागणी

पाचवा दिवस, अजूनही तळीयेतील 32 नागरिक बेपत्ता, मृतांची संख्या 53 वर; शोधकार्य सुरूच

(Pune Bangalore Highway traffic resume from Kolhapur Maharashtra also Mumbai Goa highway starts from chiplun rain and landslide update)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.