AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Riots : महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान, बळी पडू नका, शांतता पाळा; नवाब मलिक यांचं आवाहन

महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान आहे. त्याला बळी पडू नका. शांतता पाळा. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.

Amravati Riots : महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान, बळी पडू नका, शांतता पाळा; नवाब मलिक यांचं आवाहन
nawab malik
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 12:31 PM
Share

मुंबई: महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान आहे. त्याला बळी पडू नका. शांतता पाळा. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या राज्यात शांतता कशी राहिल यावर भर द्या, असं आवाहन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे.

त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत प्रचंड हिंसाचार झाला. भाजपने आज अमरावती बंदची हाक दिली आहे. मात्र, या बंदलाही हिंसक वळण लागलं आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे. पण त्याला हिंसक वळण लागू देता कामा नये. हिंसक आंदोलनाला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अमरावती, नांदेड मालेगाव या ठिकाणी लोकांनी शांतता ठेवली पाहिजे. पोलीस कायदा सुव्यवस्था राखतील. नागरिकांनीही हिंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. शांतता ठेवावी. माथी भडकविणाऱ्यांचं ऐकू नका. राज्यात शांती भंग करण्यासाठी अनेक लोक कारस्थान करत आहेत. त्याला बळी न पडता शांतता राखा, असं आवाहन मलिक यांनी केलं.

रिझवींवर कारवाई करा

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या निषेधार्थ देशात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातही बंद पुकारला गेला. देशातील सलोखा कसा बिघडेल याबाबत वारंवार प्रयत्न सुरू आहेत. पुस्तकं लिहिली जात आहेत. विधानं केली जात आहेत. लोकांची भावना दुखावण्याचं काम सुरू आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. नियोजित पद्धतीने देशातील वातावरण कसं बिघडेल हे वसीम रिझवींच्या माध्यमातून सुरू आहे. रिझवी शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन होते. तिथे त्यांनी अफरातफर केली. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात तक्रार दाखल झाली. शिया कम्युनिटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं. पण सीबीआयने यात कोणतीही कारवाई केली नाही. कोल्ड स्टोरेजमध्ये हे प्रकरण ठेवण्यात आलं आहे. या वसीम रिझवींना मोकळीक देण्यात आली असून त्यामुळे वातावरण बिघडत आहे. रिझवींवर कारवाई करावी. भविष्यात कोणतेही विधानं किंवा लिखानातून देशातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

अमरावती पुन्हा पेटले

दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशी अमरावती पेटले. अमरावतीत सकाळपासूनच जमावाकडून जोरदार दगडफेक सुरू आहे. अमरावतीत राजकमल चौकात तोंडाला रुमाल लावून आलेल्या काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडले. काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. या तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी या जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना काही लाठीमार करावा लागला. मात्र, जमाव प्रचंड असल्याने त्यांना नियंत्रित करणं अशक्य होत होतं. शिवाय पोलिसांची कुमकही कमी असल्याने जमावाला पांगवताना पोलिसांची दमछाक होत होती.

संबंधित बातम्या:

शिवसेनेने कधीही ठरवून मुस्लिमांना विरोध केला नाही, आमच्या हिंदुत्वाच्या व्याखेत सर्व जातीधर्मांना स्थान: संजय राऊत

रजा अकादमीवर बंदी घाला, नाही तर आम्ही त्यांना संपवू, महाराष्ट्रातल्या दंगलीवर राणेंचा इशारा

Video: शिवसेनेचे खोतकर म्हणाले, इन्शा अल्लाह हम तुम्हारे साथ है, भाषणाने जमाव भडकला? भरसभेतला तो व्हिडीओ चर्चेत

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती