AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीत पूरस्थिती, 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर, कोणकोणती गावं बाधित?

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपट्ट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत 41 हजार 84 कुटुंबातील 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सांगलीत पूरस्थिती, 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर, कोणकोणती गावं बाधित?
Sangli flood
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 8:19 AM
Share

सांगली : सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपट्ट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत 41 हजार 84 कुटुंबातील 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान आणि मोठी अशा एकूण 32 हजार 3 जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

आतापर्यंत किती गाव अंशत आणि पूर्णत: बाधित?

सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित 13, अंशत: बाधित 90 अशी एकूण 103 गावे बाधित आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्र (शहरी) अंशत: 1 गाव बाधित आहे. मिरज ग्रामीणमध्ये 3 गावे पूर्णत: तर 2 गावे अंशत: अशी 5 गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये 15 गावे अंशत: बाधित आहेत. वाळवा तालुक्यात वाळवा क्षेत्रातील 2 गावे पूर्णत: आणि 29 गावे अंशत: अशी एकूण 31 गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील 1 गाव पूर्णत: आणि 8 गावे अंशत: अशी एकूण 9 गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यात 1 गाव पूर्णत: तर 18 गावे अंशत: अशी एकूण 19 गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील 6 गावे पूर्णत: आणि 17 गावे अंशत: अशी एकूण 23 गावे बाधित आहेत.

किती नागरिकांचे स्थलांतरण?

स्थलांतरीत व्यक्तींमध्ये मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्र (शहरी) 13 हजार 449 कुटुंबामधील 65 हजार 135 व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 55 कुटुंबातील 4 हजार 451 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. तर अपर सांगली ग्रामीण मधील 6 हजार 67 कुटुंबातील 24 हजार 806 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील 7 हजार 918 कुटुंबातील 39 हजार 590 व्यक्तींचे तर अपर आष्टा क्षेत्रातील 3 हजार 724 कुटुंबातील 19 हजार 60 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

शिराळा तालुक्यातील 1 हजार 286 कुटुंबातील 6 हजार 565 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. तर पलूस तालुक्यातील 7 हजार 585 कुटुंबातील 37 हजार 350 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

अनेक जनावरांचे स्थलांतरण

यामध्ये जनावरांचे मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्र (शहरी) 296, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 4 हजार 952, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील 4 हजार 129, वाळवा क्षेत्रातील 8 हजार 145, अपर आष्टा क्षेत्रातील 1 हजार 677, शिराळा तालुक्यातील 3 हजार 814, पलूस तालुक्यातील 8 हजार 990 जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

मदतीचे निकष काय?

तर सांगलीतील पुरामुळे जिल्ह्यात 13 लहान/मोठी जनावरे, 3 शेळ्या, 19 हजार 360 कोंबड्यांची जीवितहानी झाली आहे. त्यांना निकषानुसार देय मदत 3 लाख 87 हजार रूपये इतकी आहे. यामध्ये गाय/म्हैस 30 हजार रूपये, लहान रेडके/वासरे 16 हजार रूपये, शेळी/मेंढी 3 हजार रूपये व कोंबड्या 50 रूपये प्रति कोंबडी परंतु 5 हजार रूपये प्रति कुटुंब मर्यादा असा निकष आहे.

(Sangli flood migration of 1 lakh 96 thousand 957 affected persons)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना महाप्रलयाचा फटका, प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे : सामना

पुण्यात अतिवृष्टीचा फटका, 12 गावं अंधारात, 7 गावांचा संपर्क तुटला, संपूर्ण कोंढरी गाव स्थलांतरीत

पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करु नये, राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर काँग्रेसचा टोला

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.