AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीत पूरस्थिती, 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर, कोणकोणती गावं बाधित?

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपट्ट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत 41 हजार 84 कुटुंबातील 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सांगलीत पूरस्थिती, 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर, कोणकोणती गावं बाधित?
Sangli flood
| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 8:19 AM
Share

सांगली : सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपट्ट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आतापर्यंत 41 हजार 84 कुटुंबातील 1 लाख 96 हजार 957 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान आणि मोठी अशा एकूण 32 हजार 3 जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

आतापर्यंत किती गाव अंशत आणि पूर्णत: बाधित?

सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित 13, अंशत: बाधित 90 अशी एकूण 103 गावे बाधित आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्र (शहरी) अंशत: 1 गाव बाधित आहे. मिरज ग्रामीणमध्ये 3 गावे पूर्णत: तर 2 गावे अंशत: अशी 5 गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये 15 गावे अंशत: बाधित आहेत. वाळवा तालुक्यात वाळवा क्षेत्रातील 2 गावे पूर्णत: आणि 29 गावे अंशत: अशी एकूण 31 गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील 1 गाव पूर्णत: आणि 8 गावे अंशत: अशी एकूण 9 गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यात 1 गाव पूर्णत: तर 18 गावे अंशत: अशी एकूण 19 गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील 6 गावे पूर्णत: आणि 17 गावे अंशत: अशी एकूण 23 गावे बाधित आहेत.

किती नागरिकांचे स्थलांतरण?

स्थलांतरीत व्यक्तींमध्ये मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्र (शहरी) 13 हजार 449 कुटुंबामधील 65 हजार 135 व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 55 कुटुंबातील 4 हजार 451 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. तर अपर सांगली ग्रामीण मधील 6 हजार 67 कुटुंबातील 24 हजार 806 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील 7 हजार 918 कुटुंबातील 39 हजार 590 व्यक्तींचे तर अपर आष्टा क्षेत्रातील 3 हजार 724 कुटुंबातील 19 हजार 60 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

शिराळा तालुक्यातील 1 हजार 286 कुटुंबातील 6 हजार 565 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. तर पलूस तालुक्यातील 7 हजार 585 कुटुंबातील 37 हजार 350 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

अनेक जनावरांचे स्थलांतरण

यामध्ये जनावरांचे मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्र (शहरी) 296, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 4 हजार 952, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील 4 हजार 129, वाळवा क्षेत्रातील 8 हजार 145, अपर आष्टा क्षेत्रातील 1 हजार 677, शिराळा तालुक्यातील 3 हजार 814, पलूस तालुक्यातील 8 हजार 990 जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

मदतीचे निकष काय?

तर सांगलीतील पुरामुळे जिल्ह्यात 13 लहान/मोठी जनावरे, 3 शेळ्या, 19 हजार 360 कोंबड्यांची जीवितहानी झाली आहे. त्यांना निकषानुसार देय मदत 3 लाख 87 हजार रूपये इतकी आहे. यामध्ये गाय/म्हैस 30 हजार रूपये, लहान रेडके/वासरे 16 हजार रूपये, शेळी/मेंढी 3 हजार रूपये व कोंबड्या 50 रूपये प्रति कोंबडी परंतु 5 हजार रूपये प्रति कुटुंब मर्यादा असा निकष आहे.

(Sangli flood migration of 1 lakh 96 thousand 957 affected persons)

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना महाप्रलयाचा फटका, प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे : सामना

पुण्यात अतिवृष्टीचा फटका, 12 गावं अंधारात, 7 गावांचा संपर्क तुटला, संपूर्ण कोंढरी गाव स्थलांतरीत

पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करु नये, राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर काँग्रेसचा टोला

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या