AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आमच्या जागांवर भाजपचा डोळा नाही हे निर्विवाद सत्य”; शिवसेनेच्या नेत्यानेच ही आतली गोष्ट सांगितली

प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे असं सांगत त्यांनी म्हटले आहे की,  मी बारामती लोकसभा मतदारसंघावर ही दावा करू शकतो असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

आमच्या जागांवर भाजपचा डोळा नाही हे निर्विवाद सत्य; शिवसेनेच्या नेत्यानेच ही आतली गोष्ट सांगितली
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 28, 2023 | 9:56 PM
Share

रत्नागिरी : राज्यातील राजकारणात सध्या लोकसभेच्या जागेवरून जोरदार चर्चा सुरु आहेत. लोकसभेच्या जागेवरून आता युती आणि आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत का असा सवाल आता अनेक जण उपस्थित करु लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभेच्या जागेवरून बिघाडी होताना दिसून येत आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्या जागेवर दावा केला असल्यामुळे आता त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यातच आता शिवसेना आणि भाजपमध्येही लोकसभेच्या जागेवरुन वाद उफाळून येणार की मित्रत्वाने हा वाद सोडवला जाणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभेच्या जागेवर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सत्तेत असलेल्या भाजपबद्दल त्यांचा आमच्या जागेवर डोळा नसल्याचे सांगत त्यांनी त्यांचा डोळा आमच्या जागेवर नसला तरी आपापला पक्ष वाढविण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मंत्री उदय ,सामंत यांनी लोकसभा जागा वाटपावरून भाजपमध्य नेमकं काय चाललय आहे. त्यावरच थेट त्यांनी निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या जागांवर भाजपचा डोळा नाही असं सांगितलं जात असलं तरी काही जागांवर डोळा असल्याची टीका वारंवार केली जात होती.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण लोकसभा आणि पोटनिवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार हंगामा सुरु होता.

त्यातच आता लोकसभेच्या जागेवरुन मित्र पक्षा पक्षामध्ये चढाओढ चालू असल्याचे दिसून येत आहे. आमच्या जागांवर भाजपचा डोळा नाही हे निर्विवाद सत्य पण प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही भाजप शिवसेना युती म्हणूनच लढणार असून दोघांनाही त्याचा फायदा होणार असंही उदय सामंत यांनी सांगितले आहे.

प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे असं सांगत त्यांनी म्हटले आहे की,  मी बारामती लोकसभा मतदारसंघावर ही दावा करू शकतो असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

यावेळी उदय सामंत यांनी सांगितले की, देशात आपल्या लोकशाही आहे, त्यामुळे कुणीही कुठल्याही मतदारसंघावर दावा करू शकतो. आमची शिवसेना उरलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असा टोला लगावत त्यांनी म्हटले आहे की, आमचा गट नाही तर शिवसेना आमची आहे असं त्यांनी ठाकरे गटाला ठणकावून सांगितले आहे.

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?