AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑनलाईन शिक्षणापेक्षा देशी दारु बरी ? नांदेडच्या विद्यार्थ्याचे थेट शिक्षणमंत्र्यांना पत्र, केली अजब मागणी

नांदेडच्या पवन जगडमवार या विद्यार्थ्याने अजब मागणी केली आहे. त्याने थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी केली आहे. या पत्राची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

ऑनलाईन शिक्षणापेक्षा देशी दारु बरी ? नांदेडच्या विद्यार्थ्याचे थेट शिक्षणमंत्र्यांना पत्र, केली अजब मागणी
नांदेडच्या विद्यार्थ्याने देशी दारूचे दुकान सुरु करण्याचा परवाना देण्याची मागणी केली आहे.
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 8:43 AM
Share

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम (Corona Rule) लागू करण्यात आले आहेत. असे असले तरी राज्यात कोरोनाचा धोका कमी होताना दिसत नाहीये. खबरदारी घेऊनदेखील मंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत अनेक व्यक्तींना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाच्या विळख्यापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी राज्यात शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडच्या पवन जगडमवार या विद्यार्थ्याने अजब मागणी केली आहे. त्याने थेट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना पत्र लिहून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी केली आहे. या पत्राची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

पोट भरण्यासाठी दारूच्या दुकानाचा परवाना द्यावा

राज्यात शाळा, विद्यालये तसेच महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. मात्र याच शिक्षणपद्धतीला नांदेडमधील विद्यार्थी पवन जगडमवार याने विरोध केला आहे. त्याने ऑनलाईन शिक्षणातून बोगस डिग्री देण्यापेक्षा दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी केली आहे. या विद्यार्थ्याने थेट उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी अनंत अडचणी आहेत. यामध्ये प्रत्यक्ष ज्ञान मिळत नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी दारूच्या दुकानाचा परवाना द्यावा, असे या विद्यार्थ्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. या अजब मागणीची राज्यात तसेच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

पवनच्या पत्रात नेमकं काय आहे ?

“माझी परिस्थिती अत्यंत गिरिबीची आहे. अनेक अडचणींना सामोरे जाऊन मी शिक्षण घेत आहे. ऑनालाईन शिक्षण देणार असल्यामुळे मला अडचणींचा सामना करावा लागतोय. मोबाईलला रिचार्ज करुनही इंटरनेट व्यवस्थित चालेल का याची शाश्वती नाही. नांदेड सारख्या शहरात राहूनही मला शिक्षणासाठी इतके पैसे खर्च करावे लागत असून फक्त ऑनलाईन शिक्षण मिळणार असेल तर माझा काहीही फायदा होणार नाही. खासगीकरणाचं शिक्षण मला परवडणारं नाही. माझी परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरचेदेखील ओरडत आहेत. अशा महामारीत दारुची दुकाने सुरु आणि शिक्षण बंद असेल तर मी शक्षण घेऊन काय करु ? देशी दारूच्या दुकानाचा परवाना देऊन मला सहकार्य करा,” असे विद्यार्थ्याने आपल्या पत्रात म्हटले आहे.

इतर बातम्या :

Interesting | वैभववाडीच्या बाजारात कॉलेजच्या मुली भाज्या का विकत होत्या? शिक्षा केली होती काय? नेमका काय प्रकार?

Fatima Sheikh social reformer : गुगलकडून महाराष्ट्रातल्या स्त्री शिक्षिकेला जयंती निमित्त अभिवादन, फातिमा शेख कोण होत्या?

MSEC Scholarship Result Topper : पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा, अहमदनगरचा डंका, गुणवत्ता यादी जाहीर

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली