AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या

बाळकृष्ण करबटे हे शनिवारी गावात फिरत असताना आरोपींनी त्यांना जंगलाच्या दिशेने नेत त्यांची हत्या केली. त्यानंतर करबटे यांच्या गळ्यातली सोन्याची चैन, हातातल्या अंगठ्या चोरुन नेल्या.

खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या
खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 8:22 PM
Share

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात नदीपात्राजवळ सापडलेल्या व्यक्तीची तुटलेली बोटे आणि मांसाचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले आहे. खेडमधील सुसेरी गावात सोन्याच्या दागिन्यांसाठी 64 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावत, या प्रकरणी गावातील चार तरुणांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. बाळकृष्ण भागोजी करबटे (वय 65) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वयम शशिकांत शिंदे (21) अजय विजय शिंदे (24), राजेश पांडुरंग पाणकर (37), निलेश पन्दिरांग पाणकर (34) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. (The mystery of the murder in Khed was solved; Murdered for gold jewelry)

बाळकृष्ण करबटे हे शनिवारी गावात फिरत असताना आरोपींनी त्यांना जंगलाच्या दिशेने नेत त्यांची हत्या केली. त्यानंतर करबटे यांच्या गळ्यातली सोन्याची चैन, हातातल्या अंगठ्या चोरुन नेल्या. हातातल्या अंगठ्या निघत नसल्याने त्या तरुणांनी कोयत्याने त्यांचे बोटे तोडून अंगठ्या काढल्या. तुटलेल्या बोटांवरून पोलिसांनी पुढील तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

नेमके प्रकरण काय?

शनिवारी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच सुरु होती. गावातले सर्व लोक मॅच पाहण्यात दंग होते. यावेळी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास बाळकृष्ण करबटे हे कचरा टाकण्यासाठी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या ओढ्याजवळ गेले. ओढ्यापासून काही अंतरावर जगबुडी नदीकडे जाणारा रस्ता आहे. तेथे काहीतरी कारण सांगत तरुणांनी त्यांना जंगलमय भागात नेले आणि त्यांना मारहाण करीत अंगावरचे सोन्याचे दागिने चोरले. तसेच हातातली अंगठी निघत नाही म्हणून चक्क कोयत्याने त्यांची बोट तोडली आणि सोन्याची अंगठी चोरली. त्यानंतर त्यांचा मृतदेह जगबुडी नदीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी करबटे बेपत्ता झाल्याने गावातील लोकांनी शोध सुरू केली असता नदीकिनारी त्यांना तुटलेले बोट, एक बॅटरी आणि मांसाचा एक तुकडा आढळला. त्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.

खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी आरोपींचा कसून तपास सुरू केला. श्वान पथक मागवण्यात आले. फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढत एकएक आरोपीच्या मुसक्या आवळल्या. नदीत फेकलेला मृतदेह खेडमधील रेस्क्यू टीमच्या सहकार्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

दामदुपटीचे अमिष दाखवून 5 लाख 64 हजार लाटले

औरंगाबादमध्ये दिलेल्या पैशांची दुप्पट किंमत मिळणार असे अमिष दाखवून औरंगाबादमधील 12 नागरिकांची फसवणूक झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. शहरातील 12 नागरिकांनी दामदुपटीच्या अमिषांना बळी पडून अशा ठिकाणी पैसे पाठवले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे (Aurangabad cyber police) धाव घेतली. मात्र तक्रार दाखल होताच, पोलिसांची तपास चक्रे फिरू लागली आणि संबंधित नागरिकांचे पैसे पुन्हा पाठवण्यात आले. (The mystery of the murder in Khed was solved; Murdered for gold jewelry)

इतर बातम्या

Mumbai Drugs Case : ड्रग्स प्रकरणात दोन आरोपींना विशेष न्यायालयाकडून दिलासा, जामीन मिळालेले दोन आरोपी कोण?

Pegasus Spying:स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आदेश

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.