.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन करुनही फारसा फायदा झाला नाही: हसन मुश्रीफ

कोरोनाची पुढची लाट मोठी असू शकते. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे. | Hasan Mushrif Maharashtra Lockdown

लॉकडाऊन करुनही फारसा फायदा झाला नाही: हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jun 05, 2021 | 12:50 PM
Share

कोल्हापूर: राज्यात लॉकडाऊन करुनही फारसा फायदा झाला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकासआघाडी सरकारची पंचाईत होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन करुन फायदा झाला नाही. आता अनलॉकमध्ये नागरिकांना खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले. (NCP leader Hasan Mushrif on Maharashtra Lockdown)

ते शनिवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोरोनाची पुढची लाट मोठी असू शकते. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे. या लाटेत लहान मुलं विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. दुकानं उघडली की लोकं जीवघेणी गर्दी करतात, ते टाळलं पाहिजे. नियोजन करुन वस्तू खरेदी कराव्यात, असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी दिला.

चाचण्या वाढवल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवू शकत नाही. राज्यात कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही. मृत्यूची आकडेवारी ही खरीच सांगितली जाते, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

‘नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे मोदींशी चांगले संबंध असल्यानेच कारवाई नाही’

बँकांना कोट्यवधी रुपयांना ठकवून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चौक्सीवरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या दोघांवर कारवाई केली जात नाही, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना हे धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही गुजरातचे आहेत. त्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघांवरही कारवाई केली जात नाही, असं सांगतानाच चोक्सीला अटक केल्यानंतर देखील आपली तपास यंत्रणा हात हलवत परत येणार हे मला माहीत होतं, असं धक्कादायक विधान मुश्रीफ यांनी केलं आहे.

पथक परतलं

चोक्सीला आणण्यासाठी भारतातून एक आठ सदस्यांचं पथक डोमिनिकाला गेलं होतं. मात्र, डोमिनिका हायकोर्टाने चोक्सीच्या प्रकरणावरील सुनावणी स्थगित ठेवली. त्यामुळे त्याचं भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकलं नाही. परिणामी भारतीय पथकाला परत यावं लागलं आहे.

संबंधित बातम्या:

‘गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणविरोधी; भाजप आणि त्यांच्या संबंधांचा तपास करा’

(NCP leader Hasan Mushrif on Maharashtra Lockdown)

Follow Us
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?