AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भात वाघ-वन्यजीव संघर्ष, इतक्या ग्रामस्थांचा मृत्यू, यांनी सांगितली उपाययोजना

ब्रम्हपुरी वनविभागातील पाच वाघांना अन्यत्र स्थलांतरित करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी केला आहे.

विदर्भात वाघ-वन्यजीव संघर्ष, इतक्या ग्रामस्थांचा मृत्यू, यांनी सांगितली उपाययोजना
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 23, 2022 | 5:32 PM
Share

चंद्रपूर – जिल्ह्यासह विदर्भात मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. एकीकडे वाघांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असताना या वाघांना पुरेसे जंगल उपलब्ध नाही. त्यांची मानव वस्तीकडे वाटचाल होत आहे. विदर्भातील विविध वनव्याप्त क्षेत्रात असलेल्या शेत शिवारात काम करणाऱ्या मजूर व शेतकऱ्यांना वाघाची मोठी भीती निर्माण झाली आहे. परिणामी मानव वन्यजीव संघर्षात चालू वर्षभरात 41 ग्रामस्थांचा मृत्यू झालाय. ही संख्या धक्कादायक आहे.

याच काळात वन विभागाने चार वाघ जेरबंद केलेत. नऊ वाघांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. तीन बिबटेदेखील मृत अवस्थेत आढळले आहेत. दरम्यान, 2014 साली चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या 190 एवढी होती. आता ती पूर्ण वाढीचे वाघ व बछडे मिळून पाचशेच्या घरात गेली आहे.

राज्याच्या वनविभागाने केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाशी सल्लामसलत करण्यात आले. ब्रम्हपुरी वनविभागातील पाच वाघांना अन्यत्र स्थलांतरित करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी केला आहे. दरम्यान नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात संघर्षग्रस्त वाघांना ठेवण्यात आले आहे. या संग्रहालयाची क्षमता देखील संपल्याने देशातील अन्य भागात असलेल्या प्राणी संग्रहालयात या वाघांना पाठविण्याबाबत सकारात्मक निर्णय होत आहे.

जंगलावरील नागरिकांची अवलंबिता कमी करून तेंदु बोनस वाढवत मनरेगाच्या माध्यमातून जैविक कुंपणाचा पर्याय शोधत मानव वन्यजीव संघर्षावर उपाययोजना केल्या जात आहेत. या प्रश्नाचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीचे गठन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

गेल्या आठ वर्षांत वाघांची संख्या अडीचपट वाढली. त्यामुळं वाघांचा वावर शेतशिवारात होऊ लागला. गावाशेजारी चराईसाठी जाणाऱ्या जनावरांचा बळी वाघ घेऊ लागला. यामुळं गावकरी त्रस्त होत आहे. सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं त्यांनी याकडं विशेष लक्ष दिलंय

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...