AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भात वाघ-वन्यजीव संघर्ष, इतक्या ग्रामस्थांचा मृत्यू, यांनी सांगितली उपाययोजना

ब्रम्हपुरी वनविभागातील पाच वाघांना अन्यत्र स्थलांतरित करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी केला आहे.

विदर्भात वाघ-वन्यजीव संघर्ष, इतक्या ग्रामस्थांचा मृत्यू, यांनी सांगितली उपाययोजना
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 23, 2022 | 5:32 PM
Share

चंद्रपूर – जिल्ह्यासह विदर्भात मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. एकीकडे वाघांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असताना या वाघांना पुरेसे जंगल उपलब्ध नाही. त्यांची मानव वस्तीकडे वाटचाल होत आहे. विदर्भातील विविध वनव्याप्त क्षेत्रात असलेल्या शेत शिवारात काम करणाऱ्या मजूर व शेतकऱ्यांना वाघाची मोठी भीती निर्माण झाली आहे. परिणामी मानव वन्यजीव संघर्षात चालू वर्षभरात 41 ग्रामस्थांचा मृत्यू झालाय. ही संख्या धक्कादायक आहे.

याच काळात वन विभागाने चार वाघ जेरबंद केलेत. नऊ वाघांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. तीन बिबटेदेखील मृत अवस्थेत आढळले आहेत. दरम्यान, 2014 साली चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या 190 एवढी होती. आता ती पूर्ण वाढीचे वाघ व बछडे मिळून पाचशेच्या घरात गेली आहे.

राज्याच्या वनविभागाने केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाशी सल्लामसलत करण्यात आले. ब्रम्हपुरी वनविभागातील पाच वाघांना अन्यत्र स्थलांतरित करण्याचा पहिला प्रयत्न यशस्वी केला आहे. दरम्यान नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात संघर्षग्रस्त वाघांना ठेवण्यात आले आहे. या संग्रहालयाची क्षमता देखील संपल्याने देशातील अन्य भागात असलेल्या प्राणी संग्रहालयात या वाघांना पाठविण्याबाबत सकारात्मक निर्णय होत आहे.

जंगलावरील नागरिकांची अवलंबिता कमी करून तेंदु बोनस वाढवत मनरेगाच्या माध्यमातून जैविक कुंपणाचा पर्याय शोधत मानव वन्यजीव संघर्षावर उपाययोजना केल्या जात आहेत. या प्रश्नाचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीचे गठन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

गेल्या आठ वर्षांत वाघांची संख्या अडीचपट वाढली. त्यामुळं वाघांचा वावर शेतशिवारात होऊ लागला. गावाशेजारी चराईसाठी जाणाऱ्या जनावरांचा बळी वाघ घेऊ लागला. यामुळं गावकरी त्रस्त होत आहे. सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं त्यांनी याकडं विशेष लक्ष दिलंय

Follow Us
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण