AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सफरचंदाची वाहतूक करणारा ट्रक पलटी, सफरचंद घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची गर्दी

अहमदनगर जिल्ह्यातील करंजी घाटाजवळ ट्रकचा अपघात झालाय. ट्रक पलटी झाला, कल्याण - निर्मळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक सफरचंदाची वाहतूक करत होता. हा ट्रक मुंबईहून नांदेडकडे सफरचंद घेऊन जात असताना करंजी घाटाजवळ हा अपघात घडला.

सफरचंदाची वाहतूक करणारा ट्रक पलटी, सफरचंद घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची गर्दी
सफरचंदाने भरलेला ट्रक पलटी
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 10:47 AM
Share

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील करंजी घाटाजवळ ट्रकचा अपघात (Truck Accident) झालाय. ट्रक पलटी झाला, कल्याण – निर्मळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक सफरचंदाची वाहतूक करत होता. हा ट्रक मुंबईहून नांदेडकडे सफरचंद घेऊन जात असताना करंजी घाटाजवळ हा अपघात घडला. आज सकाळी आठच्या दरम्यान हा ट्रक पलटी झाला. हा ट्रक कसा पलटी झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. ट्रक पलटी झाल्यामुळे सफरचंद रस्त्यावर पडले होते. नागरिकांनी या सफरचंदावर ताव मारण्यास सुरुवात केली. मात्र पोलीस (police) घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी नागरिकांना सफरंद नेण्यास मज्जाव केला.

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एक ट्रक सफरंच घेऊन मुंबईहून नांदेडकडे जात होता. याच दरम्यान हा ट्रक कल्याण- निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटाजवळ आला असता अचानक पलटी झाला. या ट्रकमध्ये सुमारे नऊ टन सफरचंद होते. ट्रक पलटी झाल्याने सर्व सफरचंद रस्त्यावर पडले. हे सफरचंद गोळा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.  मात्र अपघाताची माहिती मिळतचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्याला सुरुवात केली. पोलिसांनी नागरिकांना सफरचंद घरी घेऊन जाण्यास मज्जाव केला. या अपघातातमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ट्रकचे नुकसान

या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र वाहनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रकचा समोरचा काच फुटला आहे. सोबतच ट्रकमधील सर्व सफरचंद रस्त्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Rape on Animal | घृणास्पद! कोल्हापुरात घोरपडीवर बलात्कार, कोकणातून तरुण ताब्यात

Nashik Public Healthcare: नाशिक जिल्हा रुग्णालयात 3 महिला बोगस डॉक्टर आढळल्याने खळबळ

Aurangabad | शहरातील MIM चे जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा, पक्षाच्याच माजी नगरसेवकाची तक्रार

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.