लातूर: प्रकाश आंबेडकर यांनीच आमच्याशी युती तोडली, असं एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी मध्यंतरी म्हटलं होतं. त्यामुळे वंचित आणि एमआयएमची युती का तुटली याची पुन्हा चर्चा सुरू झाली होती. प्रकाश आंबेडकर यांनीही युती का तुटली यावर भाष्य केलं नव्हतं. मात्र, ओवैसी यांनी युती तुटल्याचं खापर आंबेडकरांवर फोडल्यानंतर आंबेडकर यांनी ही युती तुटण्याचं नेमकं कारण सांगितलं आहे. पहिल्यांदाच आंबेडकर याविषयावर बोलले आहेत. एमआयएममुळेच युती तुटल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता एमआयएम त्यावर काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.