गावातील विहिरींचे पाणी क्षारयुक्त, गढूळ पाण्यासाठी नदीपात्रात उतरावे लागते तेव्हा…

महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी थेट नदी पात्रात उतरावे लागते. असे करताना जराही तोल गेला की थेट नदी पात्रात जाण्याचा धोका कायम असतो.

गावातील विहिरींचे पाणी क्षारयुक्त, गढूळ पाण्यासाठी नदीपात्रात उतरावे लागते तेव्हा...
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 9:08 PM

चंद्रपूर : वैनगंगा नदीपात्रालगत अनेक गावं येतात. गोसे येथे धरणाचे पाणी अडवल्याने नदीच्या दोन्ही बाजूची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाळ्यात हेच पुराचे पाणी जीवघेणे ठरते. काही गावांतील शेतकऱ्यांची जमीन बुडते. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. वैनगंगा नदीच्या काठावर टोक नावाचे एक गाव आहे. या गावातील पाणी क्षारयुक्त आहे. म्हणून महिला नदीचे पाणी पिण्यासाठी आणतात. सध्या नदीचे पाणी दूषित झाले आहे. ते गढूळ झालेले पाणी नदीतून काढण्यासाठी महिलांना कसरत करावी लागते.

chandrapur 2 n

तोल नदीपात्रात जाण्याचा धोका

टोक गावाशेजारून वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी थेट नदी पात्रात उतरावे लागते. असे करताना जराही तोल गेला की थेट नदी पात्रात जाण्याचा धोका कायम असतो. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी करायचं काय ? हा प्रश्न गावकरी विचारत आहेत. ही विदारक स्थिती अद्यापही प्रशासनाला दिसलेली नाही. चंद्रपूर जिल्हातील पोंभुर्णा तालुक्याच्या शेवटचा टोकावर असलेलं लहानसे गाव टोक. गावात जेमतेम 30 कुटुंब. लोकसंख्या 200. सर्व परिवार केवट समाजाचे आहेत.

नदीपात्रातून आणावे लागते पिण्याचे पाणी

टोक गावातील लोकांकडे मोजकी शेतजमीन आणि मासेमारी हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. गावात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झाले. गावाची मुख्य समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. टोक गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी पात्रातील पाणी आणावे लागते.

नदीचे गढूळ पाणी प्यावे लागते

पिण्याच्या पाण्याची ही समस्या मार्गी लागावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य वैभव पिंपळशेंडे यांनी लावून धरली. सहा महिन्यांपूर्वी जल जीवन मिशन योजने अंतर्गत सोलर ड्युअल पम्प बसाविण्यात आले. मात्र या विहिरीचे पाणी क्षारयुक्त असल्याने पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नाही. अशात ऐन पावसाळ्यात त्यांना नदी पात्रातून पिण्याचे पाणी त्यांना आणावे लागते. सध्या नदीला गढूळ पाणी आहे. या गढूळ पाण्यासाठी ही गावाकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.