.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावातील विहिरींचे पाणी क्षारयुक्त, गढूळ पाण्यासाठी नदीपात्रात उतरावे लागते तेव्हा…

महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी थेट नदी पात्रात उतरावे लागते. असे करताना जराही तोल गेला की थेट नदी पात्रात जाण्याचा धोका कायम असतो.

गावातील विहिरींचे पाणी क्षारयुक्त, गढूळ पाण्यासाठी नदीपात्रात उतरावे लागते तेव्हा...
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 26, 2023 | 9:08 PM
Share

चंद्रपूर : वैनगंगा नदीपात्रालगत अनेक गावं येतात. गोसे येथे धरणाचे पाणी अडवल्याने नदीच्या दोन्ही बाजूची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाळ्यात हेच पुराचे पाणी जीवघेणे ठरते. काही गावांतील शेतकऱ्यांची जमीन बुडते. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. वैनगंगा नदीच्या काठावर टोक नावाचे एक गाव आहे. या गावातील पाणी क्षारयुक्त आहे. म्हणून महिला नदीचे पाणी पिण्यासाठी आणतात. सध्या नदीचे पाणी दूषित झाले आहे. ते गढूळ झालेले पाणी नदीतून काढण्यासाठी महिलांना कसरत करावी लागते.

chandrapur 2 n

तोल नदीपात्रात जाण्याचा धोका

टोक गावाशेजारून वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी थेट नदी पात्रात उतरावे लागते. असे करताना जराही तोल गेला की थेट नदी पात्रात जाण्याचा धोका कायम असतो. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी करायचं काय ? हा प्रश्न गावकरी विचारत आहेत. ही विदारक स्थिती अद्यापही प्रशासनाला दिसलेली नाही. चंद्रपूर जिल्हातील पोंभुर्णा तालुक्याच्या शेवटचा टोकावर असलेलं लहानसे गाव टोक. गावात जेमतेम 30 कुटुंब. लोकसंख्या 200. सर्व परिवार केवट समाजाचे आहेत.

नदीपात्रातून आणावे लागते पिण्याचे पाणी

टोक गावातील लोकांकडे मोजकी शेतजमीन आणि मासेमारी हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. गावात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झाले. गावाची मुख्य समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. टोक गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी पात्रातील पाणी आणावे लागते.

नदीचे गढूळ पाणी प्यावे लागते

पिण्याच्या पाण्याची ही समस्या मार्गी लागावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य वैभव पिंपळशेंडे यांनी लावून धरली. सहा महिन्यांपूर्वी जल जीवन मिशन योजने अंतर्गत सोलर ड्युअल पम्प बसाविण्यात आले. मात्र या विहिरीचे पाणी क्षारयुक्त असल्याने पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नाही. अशात ऐन पावसाळ्यात त्यांना नदी पात्रातून पिण्याचे पाणी त्यांना आणावे लागते. सध्या नदीला गढूळ पाणी आहे. या गढूळ पाण्यासाठी ही गावाकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

Follow Us
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड