AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्व विदर्भात विजेचा कहर, वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जणांचा घेतला बळी

हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय.

पूर्व विदर्भात विजेचा कहर, वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जणांचा घेतला बळी
| Edited By: | Updated on: Jul 26, 2023 | 7:09 PM
Share

नागपूर : पूर्व विदर्भात विजांचा कडकडाट सुरू आहे. आज दिवसभरात वीज पडून सात जणांचा बळी गेला. काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. काही भागात ढगाळलेले वातावरण आहे. वीज पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या दरम्यान वीज पडून चार वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच मृत्यू झाला. ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे शेतातून परत येणाऱ्या गीता ढोंगे या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यातील शेतात रोवणीचे काम करणाऱ्या कल्पना प्रकाश झोडे आणि श्रीमती परसोडे या दोन महिलांचा मृत्यू झाला. तर चंद्रपूर जिल्ह्यातील तिसऱ्या घटनेत कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील पुरुषोत्तम परचाके या 25 वर्षीय शेतकऱ्याचा फवारणी करताना वीज पडून मृत्यू झाला.

चंद्रपुरात उद्या रेड अलर्ट

चौथ्या घटनेत गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा येथे वनविभागाच्या कामावर वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजूर गोविंदा टेकाम याचाही वीज पडून मृत्यू झाला. हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय.

आर्वीत पाच महिला जखमी

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरडजवळ आर्वी शेतशिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालाय. दुर्गा ज्ञानेश्वर जांभुळे राहणार आर्वी असं मृत महिलेचं नाव आहे. पाच महिलांना विजेची आस लागली. विजेची आस लागलेल्या महिलांवर गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. शेतातील काम आटोपून घरी परत जात असताना ही घटना घडली.

महागाव येथील शेतकऱ्याचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याने पावसाची शक्यता होती. विजेच्या गडगडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान महागाव येथील शेतकरी शेतात काम करीत असताना वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. लक्ष्मण नानाजी रामटेके वय 54 वर्ष राहणार महागाव असे मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.