AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुराने घराचे स्वप्न भंगले, विक्रीसाठी साठवलेल्या धान्याला फुटले अंकूर, आता खरेदी कोण करणार?

गोडाऊनमध्ये पाणी शिरल्याने जवळपास 300 क्विंटल धान्य भिजले. त्याला आता अंकूर फुटले आहेत. धान्याला दुर्गंधी सुटली आहे.

पुराने घराचे स्वप्न भंगले, विक्रीसाठी साठवलेल्या धान्याला फुटले अंकूर, आता खरेदी कोण करणार?
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 26, 2023 | 7:43 PM
Share

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी झालीय. नदीला पूर आल्याने अनेकांचे नुकसान झाले. जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील बेंबाळेश्वर नदीला आलेल्या पुराने सुद्धा अक्षरशः थैमान घातले होते. नदीतील पुराचे पाणी जामोद येथील शेतकरी तेजराव लोणे यांच्या धान्य गोडाऊनमध्ये शिरले. त्यामुळे अक्षरशः गोडाऊनसुद्धा अर्ध्यावर बुडाले होते. गोडाऊन मध्ये पाणी शिरल्याने जवळपास 300 क्विंटल धान्य भिजले. त्याला आता अंकूर फुटले आहेत. धान्याला दुर्गंधी सुटली आहे.

धान्याची विक्री करून बांधायचे होते घर

लाखो रुपयांचे नुकसान या पुराच्या पाण्यामुळे तेजराव लोणे या शेतकऱ्याचे झाले. मागील वर्षांपासून शेतीतील हा शेतमाल दर वाढेल, या आशेने गोडाऊनमध्ये साठवून ठेवला होता. यावर्षी त्याची विक्री करून त्यांना घर बांधायचे होते. तर यातील काही माल हा विकतसुद्धा घेऊन ठेवलेला होता. मात्र पुराने आता त्याचा स्वप्न भंगले आहे. यामध्ये सोयाबीन, गहू, हरभरा, तुर , मका यासह इतरही धान्य भिजले. नुकसान झाल्याने आता घर कसे बांधायचे असा प्रश्न शेतकरी तेजराव लोणे यांच्यासमोर आहे.

गोदामात शिरले पाच फूट पाणी

जामोद गावाबाहेरून बेंबाळेश्वर नदीला पूर आला. पुरामुळे या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. तेजराव लोणे या शेतकऱ्यानी घरी गोदामाम धान्य ठेवले होते. या गोदामात पाच फूट पुराचे पाणी शिरले होते. ज्वारी, हरभरा, तूर असे धान्य दोन वर्षांपासून साठवूण ठेवले होते.

अडीचशे क्विंटल माल काळवंडला

बेंबाळेश्वर नदीतील पाणी गोदामात शिरले आणि धान्याला अंकूर फुटले. गोदामात गहू, हरभरा, तूर, मका हे सर्व पाण्याखाली होते. घरचे सगळे लोकं येऊन तिथून माल काढला. तोपर्यंत बराच माल भिजला होता. आता त्या धान्याला अंकूर आले आहेत. हे धान्य विकून आम्ही घर बांधणार होतो. पण, धान्य भिजल्याने आता आमचं घराचं स्वप्न हवेत विरल्याचं पूरपीडित शेतकऱ्याने सांगितले. सुमारे अडीचशे क्विंटल माल होता. तो काळवंडल्याने आता कुणीही खरेदी करणार नाही.

Follow Us
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा