AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुराने घराचे स्वप्न भंगले, विक्रीसाठी साठवलेल्या धान्याला फुटले अंकूर, आता खरेदी कोण करणार?

गोडाऊनमध्ये पाणी शिरल्याने जवळपास 300 क्विंटल धान्य भिजले. त्याला आता अंकूर फुटले आहेत. धान्याला दुर्गंधी सुटली आहे.

पुराने घराचे स्वप्न भंगले, विक्रीसाठी साठवलेल्या धान्याला फुटले अंकूर, आता खरेदी कोण करणार?
| Edited By: | Updated on: Jul 26, 2023 | 7:43 PM
Share

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी झालीय. नदीला पूर आल्याने अनेकांचे नुकसान झाले. जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील बेंबाळेश्वर नदीला आलेल्या पुराने सुद्धा अक्षरशः थैमान घातले होते. नदीतील पुराचे पाणी जामोद येथील शेतकरी तेजराव लोणे यांच्या धान्य गोडाऊनमध्ये शिरले. त्यामुळे अक्षरशः गोडाऊनसुद्धा अर्ध्यावर बुडाले होते. गोडाऊन मध्ये पाणी शिरल्याने जवळपास 300 क्विंटल धान्य भिजले. त्याला आता अंकूर फुटले आहेत. धान्याला दुर्गंधी सुटली आहे.

धान्याची विक्री करून बांधायचे होते घर

लाखो रुपयांचे नुकसान या पुराच्या पाण्यामुळे तेजराव लोणे या शेतकऱ्याचे झाले. मागील वर्षांपासून शेतीतील हा शेतमाल दर वाढेल, या आशेने गोडाऊनमध्ये साठवून ठेवला होता. यावर्षी त्याची विक्री करून त्यांना घर बांधायचे होते. तर यातील काही माल हा विकतसुद्धा घेऊन ठेवलेला होता. मात्र पुराने आता त्याचा स्वप्न भंगले आहे. यामध्ये सोयाबीन, गहू, हरभरा, तुर , मका यासह इतरही धान्य भिजले. नुकसान झाल्याने आता घर कसे बांधायचे असा प्रश्न शेतकरी तेजराव लोणे यांच्यासमोर आहे.

गोदामात शिरले पाच फूट पाणी

जामोद गावाबाहेरून बेंबाळेश्वर नदीला पूर आला. पुरामुळे या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. तेजराव लोणे या शेतकऱ्यानी घरी गोदामाम धान्य ठेवले होते. या गोदामात पाच फूट पुराचे पाणी शिरले होते. ज्वारी, हरभरा, तूर असे धान्य दोन वर्षांपासून साठवूण ठेवले होते.

अडीचशे क्विंटल माल काळवंडला

बेंबाळेश्वर नदीतील पाणी गोदामात शिरले आणि धान्याला अंकूर फुटले. गोदामात गहू, हरभरा, तूर, मका हे सर्व पाण्याखाली होते. घरचे सगळे लोकं येऊन तिथून माल काढला. तोपर्यंत बराच माल भिजला होता. आता त्या धान्याला अंकूर आले आहेत. हे धान्य विकून आम्ही घर बांधणार होतो. पण, धान्य भिजल्याने आता आमचं घराचं स्वप्न हवेत विरल्याचं पूरपीडित शेतकऱ्याने सांगितले. सुमारे अडीचशे क्विंटल माल होता. तो काळवंडल्याने आता कुणीही खरेदी करणार नाही.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.