AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुराने घराचे स्वप्न भंगले, विक्रीसाठी साठवलेल्या धान्याला फुटले अंकूर, आता खरेदी कोण करणार?

गोडाऊनमध्ये पाणी शिरल्याने जवळपास 300 क्विंटल धान्य भिजले. त्याला आता अंकूर फुटले आहेत. धान्याला दुर्गंधी सुटली आहे.

पुराने घराचे स्वप्न भंगले, विक्रीसाठी साठवलेल्या धान्याला फुटले अंकूर, आता खरेदी कोण करणार?
| Edited By: | Updated on: Jul 26, 2023 | 7:43 PM
Share

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी झालीय. नदीला पूर आल्याने अनेकांचे नुकसान झाले. जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील बेंबाळेश्वर नदीला आलेल्या पुराने सुद्धा अक्षरशः थैमान घातले होते. नदीतील पुराचे पाणी जामोद येथील शेतकरी तेजराव लोणे यांच्या धान्य गोडाऊनमध्ये शिरले. त्यामुळे अक्षरशः गोडाऊनसुद्धा अर्ध्यावर बुडाले होते. गोडाऊन मध्ये पाणी शिरल्याने जवळपास 300 क्विंटल धान्य भिजले. त्याला आता अंकूर फुटले आहेत. धान्याला दुर्गंधी सुटली आहे.

धान्याची विक्री करून बांधायचे होते घर

लाखो रुपयांचे नुकसान या पुराच्या पाण्यामुळे तेजराव लोणे या शेतकऱ्याचे झाले. मागील वर्षांपासून शेतीतील हा शेतमाल दर वाढेल, या आशेने गोडाऊनमध्ये साठवून ठेवला होता. यावर्षी त्याची विक्री करून त्यांना घर बांधायचे होते. तर यातील काही माल हा विकतसुद्धा घेऊन ठेवलेला होता. मात्र पुराने आता त्याचा स्वप्न भंगले आहे. यामध्ये सोयाबीन, गहू, हरभरा, तुर , मका यासह इतरही धान्य भिजले. नुकसान झाल्याने आता घर कसे बांधायचे असा प्रश्न शेतकरी तेजराव लोणे यांच्यासमोर आहे.

गोदामात शिरले पाच फूट पाणी

जामोद गावाबाहेरून बेंबाळेश्वर नदीला पूर आला. पुरामुळे या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. तेजराव लोणे या शेतकऱ्यानी घरी गोदामाम धान्य ठेवले होते. या गोदामात पाच फूट पुराचे पाणी शिरले होते. ज्वारी, हरभरा, तूर असे धान्य दोन वर्षांपासून साठवूण ठेवले होते.

अडीचशे क्विंटल माल काळवंडला

बेंबाळेश्वर नदीतील पाणी गोदामात शिरले आणि धान्याला अंकूर फुटले. गोदामात गहू, हरभरा, तूर, मका हे सर्व पाण्याखाली होते. घरचे सगळे लोकं येऊन तिथून माल काढला. तोपर्यंत बराच माल भिजला होता. आता त्या धान्याला अंकूर आले आहेत. हे धान्य विकून आम्ही घर बांधणार होतो. पण, धान्य भिजल्याने आता आमचं घराचं स्वप्न हवेत विरल्याचं पूरपीडित शेतकऱ्याने सांगितले. सुमारे अडीचशे क्विंटल माल होता. तो काळवंडल्याने आता कुणीही खरेदी करणार नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.