AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Padalkar | वडेट्टीवारांकडून मागासवर्गीय आयोगाची ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी अवस्था; पडळकरांची शेलकी टीका

पडळकर म्हणाले की, समस्त ओबीसी बांधवांना आव्हान करतो की, तुमच्या नावावरती लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालाच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा.

Padalkar | वडेट्टीवारांकडून मागासवर्गीय आयोगाची 'फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं' अशी अवस्था; पडळकरांची शेलकी टीका
Vijay Vadettiwar, Gopichand Padalkar
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 12:18 PM
Share

सांगलीः ओबीसी आरक्षणावर सारखे भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यावर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अगदी शेलक्या शब्दांत टीका केली. वडेट्टीवारांनी टक्केवारासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची ‘फुकटं घावलं आणि गाव सारं धावलं’, अशी अवस्था केल्याची टीका केली. शिवाय हे ओबीसी मंत्री जिथे भेटतील, तिथे त्यांना गाठा आणि जाब विचारा, असे आवाहन करायलाही ते विसरले नाहीत.

काय म्हणाले पडळकर?

सध्या ओबीसी आरक्षणावरून राज्यभरात भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेते असे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळते आहे. थेट छगन भुजबळांपासून विजय वडेट्टीवारापर्यंत सारेच जण ओबीसी आरक्षणावरून भाजपवर जोरदार आरोप आणि टाकाही करत आहेत. वडेट्टीवारांचा आज सांगलीमध्ये भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी 450 कोटींची घोषणा केली. वास्तवात फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेश ही आयोगाला मिळाले नाहीत. ना ॲाफीस ना पूर्णवेळ सचिव. आयोगाचे संशोधक सोलापुरात आणि आयोग पुण्यात. वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केल्याची टीका त्यांनी केली.

प्रस्थापितांसाठी पोपटपंची

पडळकर पुढे म्हणाले की, समस्त ओबीसी बांधवांना आव्हान करतो की, तुमच्या नावावरती लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालाच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा. हे ओबीसींच्या नावावर मंत्रिपद भूषवतात आणि प्रस्थापितांसाठी पोपटपंची करतात, असा आरोपही त्यांनी केला. पडळकर पुढे म्हणाले, आता तर हद्दच झाली. उद्याच्या 17 जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे. आणि त्या करिता उद्धव सरकारने आयोगाला अंतिरम अहवाल मागितला होता. पण आयोगाचे कामच सुरू नाही, तर अहवाल कसा देणार? आणि म्हणूनच दिशाभूल करण्यासाठी लगबगीने वडेट्टीवारांनी तीन महिन्यांची मुदत न्यायालयाला मागणार असे जाहीर केले. याचा अर्थ महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकांत ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही. आणि प्रस्थापित ओबीसींच्या राजकीय हक्कावरती डल्ला मारणार. त्यामुळे मी समस्त ओबीसी बांधवांना आव्हान करतो की, तुमच्या नावावरती लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.