AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात दुर्घटना, चंद्रभागेत बुडून तरुणाचा मृत्यू

पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेच्या आधीच एक दुर्दैवी घटना घडली. शुभम पावले (२७) नावाचा तरुण भाविक चंद्रभागा नदीत बुडून मृत्यूमुखी पडला. तो मित्रांसह विठ्ठलाच्या दर्शनासाठी आला होता. घटनेनंतर शोधकार्य करून त्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात दुर्घटना, चंद्रभागेत बुडून तरुणाचा मृत्यू
| Updated on: Jun 20, 2025 | 2:46 PM
Share

पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक आहे. आता या आषाढी एकादशी यात्रेच्या अगदी तोंडावरच एक दुर्दैवी घटना घडली आहे. चंद्रभागा नदीत बुडून एका तरुण भाविकांचा मृत्यू झाला आहे. शुभम पावले (२७) असे या तरुणाचे नाव आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा नदीत बुडून शुभम पावलेचा या तरुण भाविकाचा मृत्यू झाला आहे. तो आपल्या मित्रांसोबत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेला होता. आज सकाळी तो पुंडलिक मंदिराशेजारील चंद्रभागा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला असता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. तब्बल चार तासांच्या शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह आढळून आला. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असतानाही ही घटना घडल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

आरोग्य विभाग वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज

पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पालख्यांच्या माध्यमातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे पुणे शहर सध्या वारीमय वातावरणाने भारलेलं दिसत आहे. पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

“आम्हाला जरी पंढरपूरला जाता आले नाही, तरी पंढरीची वाट चालणाऱ्या वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांची सेवा करणे म्हणजे थेट पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करण्याचे भाग्यच आम्हाला मिळत आहे,” अशी भावना आरोग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

आषाढी वारीसाठी उजनीतून चंद्रभागेत पाणी सोडणार

आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वारकऱ्यांसाठी उजनी धरणातून 1600 क्युसेक्सने पाणी भीमा नदीत (चंद्रभागेत) सोडले जाणार आहे. आज दुपारी 3 वाजल्यानंतर उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरू होईल. आषाढी वारीसाठी आलेले वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करूनच आपली वारी पूर्ण करतात. चंद्रभागेत स्नान करण्याचे वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या पवित्र स्नानासाठी हा पाण्याचा विसर्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत