AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parab on Somaiya | सोमय्या जाता-जाता स्वतः पडले; त्यांनी नौटंकी करू नये, मंत्री परबांचे शेलके उत्तर

दरेकरांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना परब म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मला कळाले. तोपर्यंत मला काहीही माहिती नव्हती. सोमय्यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्यांनी सगळ्यांचे भ्रष्टाचार काढले पाहिजेत.

Parab on Somaiya | सोमय्या जाता-जाता स्वतः पडले; त्यांनी नौटंकी करू नये, मंत्री परबांचे शेलके उत्तर
किरीट सोमय्या, अनिल परब
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Feb 06, 2022 | 12:35 PM
Share

नाशिकः परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आज नाशिकमध्ये किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपवर जोरदार शरसंधान साधले. शिवाय भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केलेल्या आरोपालाही प्रत्युत्तर दिले. सोमय्यांवर हल्ला होणार असल्याचे परबांना माहिती होते. दरेकरांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना परब म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मला कळाले. तोपर्यंत मला काहीही माहिती नव्हती. सोमय्यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्यांनी सगळ्यांचे भ्रष्टाचार काढले पाहिजेत. राजकीय नौटंकी करू नये. त्यांना फिजिकल मारहाण झाली नाही. ते जात असताना स्वतः पडले, अशा शब्दांत अनिल परबांनी सोमय्यांवरील आरोपांना उत्तर दिले. आता यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमके काय म्हणाले होते दरेकर?

मंत्री अनिल परब यांनी दरेकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आज दरेकरही नाशिकमध्ये होते. त्यांनी आघाडी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यावेळी ते म्हणाले की, किरीट सोमय्यांवरील हल्ला हा पूर्वनियोजित कट आहे. नितेश राणे हा सर्वात मोठा प्रश्न मानून आघाडी सरकारचे काम सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने छळवाद मांडलाय. नितेश राणे हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे, या अविर्भावात सरकार काम करत आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालीय. मात्र, परिवहन मंत्री एसटी प्रश्न सोडवू शकले नाहीत. सोमय्या यांच्यावर हल्ल्याचा कट पूर्वनियोजित होता. अनिल परब म्हणतात हे होणारच होतं. 100 ते 150 शिवसैनिकांनी हा कट पार पडला. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. झेड सिक्युरिटीच्या कवचात असलेल्या नेत्यावर जीवघेणा हल्ला लज्जास्पद असल्याचे ते म्हणाले. या आरोपाचा समाचारच परबांनी घेतला.

लतादीदींनी श्रद्धांजली…

अनिल परब यांनी यावेळी लतादीदींनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, आपल्या देशाचे भाग्य थोर आहे की, देशात असा स्वर जन्माला आला. आज तो स्वर हरपला आहे. दैवी चमत्कार असणारा लतांचा आवाज आहे. हा आवाज शतकानुशतके राहील. त्यांच्या निधनाने पूर्ण देश शोकाकुल झाला आहे. माझी देखील त्यांना श्रद्धांजली आहे. महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाले, तेव्हा लतादीदी त्या कार्यक्रमातला होत्या. त्यावेळी लता दीदींना भेटण्याचा योग आला होता, अशी आठवणही परब यांनी यावेळी सांगितली.

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

लता मंगेशकरांचे गाणे आपल्याला कितीही आवडे, पण आपण ‘क्या कमाल कि गाती है’ असं नाही म्हणू शकत, का ते जाणून घ्या

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली