AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कराडमध्ये विमानतळाचा विस्तार करण्याची योजना, नवीमुंबईचा एअरपोर्ट पुढच्या वर्षी सुरु होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

कोल्हापूर परिसरात काही वर्षांपूर्वी पूर आला तेव्हा कोल्हापूर विमानतळ पाणी भरल्याने लोकांना लिफ्ट करण्यासाठी जवळपास विमानतळच नसल्याचे पुढे आले, त्यामुळे कराडमध्ये विमानतळ करण्याची योजना पुढे आली.

कराडमध्ये विमानतळाचा विस्तार करण्याची योजना, नवीमुंबईचा एअरपोर्ट पुढच्या वर्षी सुरु होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2023 | 2:31 PM
Share

मुंबई | 21 जुलै 2023 : राज्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या एअरपोर्टची गरज असून कराड शहरात जमीन संपादन करण्यासाठी पुन्हा जोमाने  प्रक्रिया राबवि ण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली आहे.  नवीमुंबईचा विमानतळ पुढच्या वर्षी सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील अन्य ठिकाणी विमानतळ सुरु करण्याच्या योजनांची देखील त्यांनी यावेळी माहीती दिली.

मुंबईतील विमानतळाला दोन धावपट्ट्या असल्या तरी एकावेळी एकच धावपट्टी वापरता येते. त्यामुळे विमान उड्डाणांवर मर्यादा येत असते. त्यामुळे नवीमुंबईतील विमानतळाचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला होता. आता नवीमुंबईच्या विमानतळाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्ट्या देखील तयार करण्यात आल्या आहेत. त्याचे फायनल कोटींग लवकरच होईल आणि टर्मिनलचे कामही अंतिम टप्प्यात असून ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल असे प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी सांगितले.

कराडला मोठा एअरपोर्ट का गरजेचा

काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला मोठा पूर आला होता. त्यावेळी पुरामुळे कोल्हापूरचा एअरपोर्ट वापरता येत नव्हता. त्यामुळे कराड सारख्या मध्यवर्ती भागात मोठ्या विमानतळाची गरज निर्माण झाली. परंतू तेथील लोक जमिन देण्यास विरोध करीत आहेत. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी सांगितले.

संभाजीनगरात मोठी विमाने उतरविता येणार 

मुंबई विमानतळाकडे दुपारचा टाईम स्लॉट उपलब्ध नसल्याने रिजनल कनेक्टीविटी साठी अडचणी येत आहेत. तसेच संभाजीनगरातील विमानतळासाठी जमीन संपादनासाठी 800 कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे संभाजीनगरात मोठी विमाने उतरविणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला धावपट्टीसाठी लांबीसाठी जमिन मिळाली, परंतू रुंदीसाठी जमिन कमी पडली आहे. त्यामुळे आणखी जमिन संपादन करावे लागणार आहे.

एकाच नोडल एजन्सीसाठी मुख्यमंत्र्यांशी बैठक 

नांदेड विमानतळासाठी सरकार पैसे  द्यायला तयार आहे. रिलायन्सकडून ते नंतर वसुल करण्यात येतील. परंतू नांदेडला नाईट लॅण्डींगची सुविधेसह काम व्हावे अशी योजना आहे. परंतू मुंबई विमानतळाकडे दिवसाचा स्लॉट नसल्याने अडचणी आहेत. एका नांदेडला नाईट लॅण्डींग सुविधा झाली की रिजनल कनेक्टीविटी होऊन विमानतळ फायद्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील काही विमानतळ एमआयडीसी तर काही अन्य एजन्सीकडे असल्याने सर्वांसाठी एकच नोडल एजन्सी तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्याशी बैठक केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ
चीन सीमावादाच्या मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ.
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न
चीन समोर असताना 56 इंच छातीला काय झाले होते? राहुल गांधींचा प्रश्न.
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर
पार्थ पवारांना मोठा दिलासा! मुंढवा जमीन प्रकरणात अपडेट समोर.
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको
जळगावमध्ये शेतकरी आक्रमक; L 53 महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?.
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई पालिकेत भाजपला समर्थन देण्याचं वृत्त; ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण.
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!
राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर!.
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट
विदिप जाधव कुटुंबियांना सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट.
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
मद्यधुंद चालकाने 14-15 जणांना उडवलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार.
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल
जल जीवन मिशन महाराष्ट्राचा निधी थांबला? संजय राऊतांचा राज्यसभेत सवाल.