AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटीलला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्या जाधवला मोठा धक्का, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या डान्सने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या ऐश्वर्या जाधवला मोठा धक्का. पोलिसांनी घेतला मोठा निर्णय. नेमकं काय घडलं?

गौतमी पाटीलला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्या जाधवला मोठा धक्का, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 07, 2026 | 6:13 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या डान्सने प्रेक्षकांना वेड लावणारी ऐश्वर्या जाधव पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ढोरे वस्ती, केसनंद येथे आयोजित करण्यात आलेल्या छाया ग्रुप केसनंद दहीहंडी महोत्सवात प्रसिद्ध नृत्यांगना ऐश्वर्या जाधवच्या लावणी कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. लावणी कार्यक्रमादरम्यान अश्लील हावभाव होऊन धार्मिक तसेच सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण पोलिसांनी दिले आहे.

निखिल तानाजी ढोरे यांच्या आयोजनाखाली ढोरे वस्ती, केसनंद येथे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात नृत्यांगना ऐश्वर्या जाधव हिच्या लावणी कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आल्यानंतर पोलिसांनी ती नाकारली.

पोलिसांनी का नाकारली परवानगी?

पोलिसांनी परवानगी नाकारताना लावणीच्या सादरीकरणादरम्यान अश्लील हावभाव होण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. तसेच अशा प्रकारच्या सादरीकरणामुळे धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, कार्यक्रमस्थळी उपस्थित महिलांच्या मनात लज्जेची भावना निर्माण होऊ शकते अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय अशा परिस्थितीत कार्यक्रमस्थळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या परवानगी नाकारण्याच्या कारणांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लावणी कार्यक्रमास परवानगी देण्यात आलेली नाही.

कार्यक्रमामध्ये होणार बदल

दहीहंडी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करताना कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून पोलिसांकडून परवानगी दिली जाते. कार्यक्रमाच्या स्वरूपामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्यास प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाते.

केसनंद येथील या दहीहंडी महोत्सवात ऐश्वर्या जाधवच्या लावणी कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याने आयोजकांच्या नियोजित कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे सार्वजनिक उत्सवांमध्ये सादर होणाऱ्या सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी परवानगीचे निकष आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात