AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिल थकले, फोन कनेक्शन कापले, इंटरनेट बंद, 23 दिवसांपासून पोस्टाचे व्यवहार ठप्प

पोस्टाचे खातेदार वाढले आणि व्यवहारही वाढला आहे. परंतु इंटरनेट सेवा ठप्प असल्याने पोस्ट खातेदारांचे नुकसान होत आहे. काहींना आपल्या विमा पॉलीसीचे प्रिमियम भरता येत नाही. त्यामुळे त्यांना दंड बसणार आहे.

बिल थकले, फोन कनेक्शन कापले, इंटरनेट बंद, 23 दिवसांपासून पोस्टाचे व्यवहार ठप्प
पोस्ट ऑफिस
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Feb 02, 2023 | 12:09 PM
Share

निलेश डाहाट, चंद्रपूर : शासकीय खात्याची व्यवस्था अजूनही जुन्या पद्धतीच सुरु आहे. यामुळे कधी वीज कनेक्शन तोडले जाते, कधी अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याची कारवाई केली जाते. त्याचा परिणाम अर्थात जनतेच्या कामांवर होत असतो. शहरापेक्षा ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिकच बिकट आहे. तब्बल 23 दिवसांपासून बिल थकल्यामुळे इंटरनेट कापले गेले. अन् पोस्टाचे सर्व कामकाज ठप्प झाले.

आधुनिकरणाचे वारे हळूहळू सर्वत्र पोहचले. सर्वच शासकीय विभागाचे काम आता इंटरनेटशिवाय होत नाही. ग्रामीण भागातील गावागावात असलेले पोस्ट विभागाच्या सर्वच कामांना आता इंटरनेट हवे असते. पोस्ट बँक झाल्यापासून केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये थेट सहभाग पोस्टमार्फत दिला जाऊ लागला. तसेचृ पोस्ट विभागाने कात टाकत काळनुरुप बदल केला. यामुळे पोस्ट विभागाला चांगलेच महत्व आले. पुन्हा पोस्टात गर्दी दिसू लागली. विविध योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी जनता जाऊ लागली,.

का कापले कनेक्शन

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली शहरातील पोस्टाचे इंटरनेट कनेक्शन कापले गेले आहे. यामुळे गेल्या 23 दिवसांपासून पोस्टातील व्यवहार ठप्प झाले आहे.  नोव्हेंबर महिन्यांपासून दूरसंचार विभागाचे बिल भरले नाही. बिल किती 4 हजार 972 रुपये. परंतु हे बिल वेळेवर भरले नाही. मग दूरसंचार विभागाने आपले कर्तव्य बजावले. अन् नऊ जानेवारीला कनेक्शन कापले. तेव्हापासून आजपर्यंत येथील काम थांबले. या कार्यालयातील पोस्टाच्या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत.

कामकाज थांबले

पोस्टाचे खातेदार वाढले आणि व्यवहारही वाढला आहे. परंतु इंटरनेट सेवा ठप्प असल्याने पोस्ट खातेदारांचे नुकसान होत आहे. काहींना आपल्या विमा पॉलीसीचे प्रिमियम भरता येत नाही. त्यामुळे त्यांना दंड बसणार आहे. आरडी व पोस्ट बँकेचे सर्व व्यवहार थांबले आहे. त्याचा मनस्ताप खातेदारांना सोसावा लागत आहे. आता दूरसंचार विभागाचे बिल भरून सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी पोस्ट खातेदारकाकडून केली जात आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय