AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकरांकडून प्रधान यांच्या राजीनाम्याची चिरफाड; त्या दोन गोष्टींवर ठेवलं बोट

धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी विद्यार्थी जे निर्णय घेतील, त्यांना पाठिंबा असेल, असेही त्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकरांकडून प्रधान यांच्या राजीनाम्याची चिरफाड; त्या दोन गोष्टींवर ठेवलं बोट
| Updated on: Jul 25, 2026 | 4:13 PM
Share

देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे ध्रमेंद्र प्रदान यांनी राजीनामा द्यावा लागला. 12 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा मोदी सरकारच्या कॅबिनेट पदावरील मंत्र्यांने राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकर यांनी पहिली प्रतक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. आंदोलनात समाजकंटक घुसतात, असं वक्तव्य राजीनाम्यात केलं आहे. त्यांनी 22 जणांनी आत्महत्या केली, याबद्दल त्यांनी कुठलीही खंत व्यक्त केलेली नाही. पोलिसांनी केलेल्या अमानुष अत्याचारांचा राजीनाम्यात उल्लेख नाही. नुकसानभरपाई देणार, याबाबत कुठेही स्पष्टता यायला हवी होती’.

‘धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल टाकलं आहे. जे झुकणार नाही असं म्हणाले त्यांना आता नाक रगडवले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचा सरकारवर राग आहे, असं दिसतंय . आधी झुरळ हा शब्द म्हणून आणि नंतर लाठीचार्जचे व्हिडिओ केलेले आम्हाला बघायला वेळ नाही हे दोन वाक्य त्यांचे होते. नुकसानभरपाई आणि परीक्षेतील सुधारणा याबद्दल सरकार बोलायला तयार नाही, त्यामुळे माघार का घ्यावी. विद्यार्थी जे निर्णय घेतील, त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल, असे त्यांनी सांगितले.

राजीनाम्याआधी आंबेडकरांनी सरकारला दिला होता मोठा इशारा

केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याआधी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला मोठा इशारा दिला होता. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं की, ‘काल कारवाई झाली, ती उशिरा झाली. कारवाईमध्ये काहीशी अशी परिस्थिती आहे. जंतरमंतर विध्यार्थी यांची मागणी आहे की, धर्मेंद्र प्रधान यांचा यांचा राजीनामा झाला पाहिजे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांना प्रतप्रंधान मोदी आणि अमित शहा काढू शकत नाही. येत्या आठवडा भरात राजीनामा झाला नाही, तर आम्ही लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत’.

‘अभिजीत दिपके यांना मी निरोप पाठवला आहे की, या आंदोलनाला राजकीय स्वरूप येऊ नये याची काळजी घ्यावी. शरद पवार यांना या आंदोलनापासून दूर ठेवा. शिक्षणमंत्र्यांनी सर्व लोकप्रतिनिधी यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी करावी. जो कुणी मागणी करणार नाही, त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहे. राजकीय पक्ष आणि आंदोलक यांनी आराखडा ठरवून आंदोलन करावं, असेही ते म्हणाले होते.

Follow Us
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर...
आत्ता जर सरकारने ऐकलं नाही तर... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर दमानियांची सुचक प्रतिक्रिया
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय
This is the Beginning of the End... मोदी सरकारचा शेवट जवळ आलाय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लीला रवाना; मोठ्या...
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
Supriya Sule | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली!
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, पहा व्हिडीओ
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?