Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच नाही? ठाकरेंच्या विधनामुळे खळबळ; सांगितलं दिल्लीत काय घडलं?
शातील जनतेवर दबाव टाकला जात होता. जणू काही या देशात लोकं शिल्लक राहिलेले नाही. सध्याची परिस्थिती पाहून मला 'एक मच्छर साला' हा संवाद आठवला. एका झुरळाने या सरकारला झुकवलं आहे. आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेला असं समजू नका, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी मंत्रिपदाची खुर्ची सोडल्याने संपूर्ण देशात जल्लोष केला जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हजारो तरुण आंदोलन करत होते. कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणजेच सीजेपीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होते. अखेर या लढ्याला यश मिळाले आहे. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांची जागा कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय शिक्षणमंत्री होऊ शकतात, असे भाकित खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. राऊतांनी हे भाकित व्यक्त केलेले असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत संशय व्यक्त केला आहे.
गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ
मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आज (25 जुलै) पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी 26 जुलै रोजीच्य मुंबईत आयोजित केलेल्या त्यांच्या मोर्चाबाबत माहिती दिली. आमचा हा मोर्चा आता विजयी रॅली असेल, असे ठाकरे बंधू म्हणाले. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचं विधान केलं. गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ आहे. याचं कारण सर्वांना माहीत आहे. मला पहिल्या प्रथम अभिजीत दीपके आणि देशातील सर्व तरुणांचं अभिनंदन करायचं आहे. न घाबरता त्यांना समर्थन देणाऱ्या पालकांचं अभिनंदन करायचं आहे. या आंदोलनाने देशातील तरुणांना भयाच्या छायेतून काढलं आहे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.
आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून…
तसेच, देशातील जनतेवर दबाव टाकला जात होता. जणू काही या देशात लोकं शिल्लक राहिलेले नाही. सध्याची परिस्थिती पाहून मला ‘एक मच्छर साला’ हा संवाद आठवला. एका झुरळाने या सरकारला झुकवलं आहे. आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेला असं समजू नका. देशातील युवा शक्ती एकत्र आली तर काय होऊ शकते हे दिसतं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.
त्यांनी राजीनामा दिला की…
तसलेच, दीपकेचं ट्विट पाहिलं. त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. त्यांच्या दोन मागण्या बाकी आहेत. प्रधान यांच्या राजीनाम्याची महत्त्वाची मागणी होती. ती झाली. त्यांनी राजीनामा दिला की खातेबदल झालाय ते कळेल, असं महत्त्वाचं विधान ठाकरे यांनी केलंय. या ठाकरे यांनी प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत संशय व्यक्त केल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आता 26 जुलै रोजीच्या ठाकरे यांच्या विजयी रॅलीत काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
