विरोधी पक्ष अजिबात जिवंत नाही… प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका, थेट मोशीत जात..
पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात मोठी दुर्घटना घडली. गेल्या 44 तासांपासून बचावकार्य सुरू आहे. मात्र, अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. यादरम्यानच प्रकाश आंबेडकर मोशी येथे पोहोचले, त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले असून आणखीन काही जण अडकली आहेत. घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, लष्कराचे जवान, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय पथके सातत्याने कार्यरत असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गेल्या 44 तासांपासून बचावकार्य सुरू आहे, पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यात यश मिळत नाहीये. नागरिकांचा मोठा संताप बघायला मिळतो. जर एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर लगेचच काम झाले असते, असा आरोप केला जात आहे. यादरम्यानच आता प्रकाश आंबेडकर हे मोशी येथे पोहोचले. प्रकाश आंबेडकरांकडून पाहणी करण्यात आली.
यादरम्यान बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, याचे मॅनेजमेंट व्यवस्थित करावे लागेल हे यामधून दिसत आहे. कामगारांचे नुकसान झाले, कामगार गेले ही एक दुखद बाब आहे. याचे मॅनेजमेंट व्यवस्थित झाले पाहिजे, असे मला वाटते. सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे. छोटी महापालिका असली तरीही हा कचऱ्याचा प्रॉब्लेम सगळीकडेच येत आहे. याच्यामध्ये सल्यूशन देणे महत्वाचे आहे. मागेही मी याबाबत बोललो होतो. जोपर्यंत तुम्हाला याची एक्सपर्ट कमिटी करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला जुन्या पद्धतीनेच त्यावर प्रक्रिया करावी लागेल.
14 से टन पिंपरी चिंचवड महापालिकेचा कचरा आहे, माझ्या माहितीनुसार. त्याकरिता पहिल्यांदा तेवढा कचरा साठवण्यासाठी तुम्हाला जागा लागेल. कामगार आणि ढगारा वेगवेगळ्या ठिकाणी असला पाहिजे, हे मला माहिती आहे. म्हणून महापालिकेने स्वत:च्या जागा विकत घेतल्या पाहिजेत. तिथे लोकवस्ती नसणार हे देखील बघितले पाहिजे. कचरा डेपोच्या बाजूला बिल्डिंग असू शकत नाही.
जे कुटुंब आहे, त्यांना न्याय कसा मिळेल, हे आम्ही बघू. मुख्यंत्र्यांसोबत बसून हा जो घनकचरा जो आहे त्याबाबत गॅसिफिकेशन जी पद्धत आली आहे, त्यामधून वेगळा मार्ग काढला पाहिजे, असे मला वाटते. ठेकेदार यामध्ये गुन्हेगार आहेच. ठेकेदारवर गुन्हे दाखल होणारच. महापालिकेचे अधिकारीही यामध्ये येणारच.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी थेट म्हटले की, तुम्हाला वाटते का विरोधीपक्ष जिवंत आहे? अजिबात विरोधी पक्ष हा जिवंत नाहीये. तो मृत अवस्थेत आहे. हे युद्धपातळीवर केले पाहिजे होते, आतापर्यंत बॉडी काढल्या पाहिजे होत्या. जमिनीखाली माणूस जिवंत आहे का? हे कळत यंत्राने.. मी अधिकाऱ्यांना म्हटलो की, माणूस जिवंत आहे की नाही हे तुम्ही नातेवाईकांना सांगा..