AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात एंट्री, शिंदेशाही पुन्हा धोक्यात

सोलापूर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीतला वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कंबर कसली आहे. मात्र ऐनवेळी भाजपने कोणत्याही परिस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आपली जागा कायम ठेवण्यासाठी डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजींना निवडणूक रिंगणात उतरवून शिंदेंच्या विजयाचा मार्ग खडतर केलाय. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. […]

प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात एंट्री, शिंदेशाही पुन्हा धोक्यात
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

सोलापूर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीतला वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी कंबर कसली आहे. मात्र ऐनवेळी भाजपने कोणत्याही परिस्थितीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आपली जागा कायम ठेवण्यासाठी डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजींना निवडणूक रिंगणात उतरवून शिंदेंच्या विजयाचा मार्ग खडतर केलाय. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनमोहन सिंग मंत्रिमंडळातील ज्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला, त्यातील एक नाव म्हणजे सुशीलकुमार शिंदे. कधीच पराभव न पाहिलेल्या सुशील कुमार शिंदेचा मोदींच्या लाटेत तब्बल दीड लाखांनी पराभव झाला. भाजपच्या शरद बनसोडे यांचा दीड लाखांच्या फरकाने विजय झाला. 40 वर्षाची शिंदेशाही संपली आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचं कमळ फुललं.

ज्या अपेक्षेने मतदारांनी कमळ फुलविलं, त्या मतदारांचा मात्र अपेक्षाभंग झाला. साडे चार वर्षातील खासदार शरद बनसोडे यांची कामगिरी सुमार असल्याचं जनतेचं म्हणणं आहे. शिवाय पक्षश्रेष्ठीही बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. नेमके हेच हेरून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली, जनसंपर्क वाढवला. शरद बनसोडे हेच भाजपचे उमेदवार गृहीत धरून शिंदे यांनी आपला गेलेला गड पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एका अर्थाने शिंदे यांच्या विजयाचा मार्ग मोकळाही झाला होता. मात्र  पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून लिंगायत समाजाचे धर्मगुरु जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे नाव पुढे आणले. मतदार संघातील जातीय समीकरणे पाहता सिद्धेश्वर महास्वामीजींना मानणाऱ्यांची संख्या जास्त जास्त आहे. त्यामुळे विजयाच्या जवळ असणाऱ्या शिंदेची वाट बिकट झाली आहे.

जयसिद्धेश्वर महाराजांच्या संभाव्य उमेदवारीने शिंदेची वाट बिकट झालेली असतानाच त्यात आता भर पडलीय ती भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीच्या शक्येतची. सोलापूर राखीव मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची पहिली सभा घेऊन वातावरण निर्मितीसुद्धा चांगलीच केली. शिवाय मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या अनुसूचित जाती, मुस्लीम यांची मतेही प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंच्या हक्काची मते ही वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या पारड्यात पडू शकतात. त्यामुळे शिंदेंना आपल्या पराभवाचा वाचपा काढण्याबरोबरच आपल्या हक्काची मते कशी रोखता येतील यासाठी कंबर कसावी लागणार असल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जातं आहे. हे सर्व सुरु असताना त्याचा थेट फायदा भाजपाला होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

सध्या संभाव्य उमेदवारीची चर्चा सुरु आहे. त्यामुळे विविध राजकीय समीकरणे समोर येत आहेत. ऐनवेळी सोलापूरच्या राजकारणात काहीही होऊ शकतं हे 2014 ला सर्वांनी पाहिलंय. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोण अधिकृत उमेदवाराला तिकीट देणार याची वाट पाहावी लागेल. मग त्या नंतरची समीकरणे काय असतील याची उत्सुकता लागली आहे. मात्र सध्या तरी शिंदेंच्या विजयाची वाट अवघड झाली आहे हे नक्की.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.