AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक, भर पावसात रेल्वे रुळांवर ठिय्या, अखेर प्रशासनाने उचलले पाऊल

सांगलीतील शेतकरी आंदोलनामुळे एका पॅसेंजरसह सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस भिलवडी रेल्वे स्थानकावर जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळापासून खोळंबली होती

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक, भर पावसात रेल्वे रुळांवर ठिय्या, अखेर प्रशासनाने उचलले पाऊल
| Updated on: May 13, 2025 | 11:37 PM
Share

सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते. बाधित शेतकऱ्यांकडून रुळांवरच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. तब्बल सहा तास शेतकऱ्यांनी रुळावर आंदोलन केलं. या आंदोलनाचा मोठा फटका हा रेल्वे वाहतुकीला बसला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुण्याहून मिरज, कोल्हापूर आणि कर्नाटककडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती.  अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी मागे हटले.

सांगलीतील शेतकरी आंदोलनामुळे एका पॅसेंजरसह सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस भिलवडी रेल्वे स्थानकावर जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळापासून खोळंबली होती. दरम्यान त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून या शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी हे शतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.

शेतकरी प्रचंड आक्रमक

सांगलीत प्रचंड पावसातही या बाधित शेतकऱ्यांचं रेल्वे रुळावर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे पुण्याहून मिरज, कोल्हापूर आणि कर्नाटककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या आंदोलनामुळे एका पॅसेंजरसह सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस भिलवडी रेल्वे स्थानकावर जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ खोळंबली होती. शेतकरी प्रचंड आक्रमक झाले होते.

अखेर आंदोलन स्थगित

अखेर या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना बैठकीचं आश्वासन देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर एक तासापासून रोखून धरलेली पॅसेंजर अखेर शेतकऱ्यांनी सोडली. बैठकीच्या अश्वासनानंतर शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावरील आंदोलन देखील मागे घेतले आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.